TRENDING:

भीषण अपघातात तुटलेला अवयव पुन्हा जोडता येतो का? डाॅक्टर सांगतात, "होय, पण..."

Last Updated:

अपघातग्रस्त व्यक्ती लवकर हॉस्पिटलमध्ये नेल्यास त्यांना अपंगत्वापासून वाचवता येते. टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने अनेकांना पूर्वीप्रमाणे आयुष्य जगता येतं. फक्त एखादा अवयव तुटला असल्यास...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
रस्ते अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागतो, तर अनेकांना आपल्या शरीराच्या एखादा अवयय गमवावा लागतो. भरधाव वेग, हेल्मेटचा अभाव आणि रात्रीच्या वेळी वाढणारी वाहतूक ही या अपघातांमागील प्रमुख कारणे आहेत. वाहतूक नियंत्रण, मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई, जनजागृती कार्यक्रम आणि रस्ते सुरक्षेतील बदलांद्वारे पोलीस अपघातांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. तरीही, दररोज होणारे मृत्यू ही चिंतेची बाब आहे.
News18
News18
advertisement

प्रगत तंत्रज्ञानामुळे अवयव जोडता येतो

अपघात तर नेहमीच होत असतात. पण आता प्रगत तंत्रज्ञानामुळे, अपघात कितीही गंभीर असला तरी डॉक्टर शस्त्रक्रिया करून अनेकांचे प्राण वाचवत आहेत. पूर्वीच्या काळी, अपघातात शरीराचा एखादा अवयव तुटल्यास, लोकांना आयुष्यभर अपंगत्वाचा सामना करावा लागत असे. पण आता तसे राहिलेले नाही. शरीराचा एखादा भाग जरी तुटला, तरी डॉक्टर शस्त्रक्रिया करून तो पुन्हा जोडत आहेत, जेणेकरून लोकांना सामान्य जीवन जगता येईल.

advertisement

6 तासांच्या आत आणावा लागलो अवयव

विशाखापट्टणम येथील एमजीएम (MGM) रुग्णालयाच्या वरिष्ठ प्लास्टिक सर्जन डॉ. अंजली सपलाई यांनी सांगितले की, अपघातादरम्यान शरीराचा एखादा भाग तुटल्यास, तो ठराविक वेळेत रुग्णालयात आणल्यास शस्त्रक्रियेद्वारे पुन्हा जोडला जाऊ शकतो. अपघातानंतर 6 तासांच्या आत तो अवयव रुग्णालयात आणल्यास, तो निश्चितपणे पुन्हा जोडता येतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

advertisement

तो अवयव आणताना कसा आणावा?

शरीरापासून वेगळा झालेला अवयव रुग्णालयात आणताना काही विशेष काळजी घेतली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. तो तुटलेला भाग एका स्वच्छ पिशवीत ठेवावा आणि त्या पिशवीभोवती बर्फ ठेवून सुरक्षितपणे रुग्णालयात आणावा. प्रगत तंत्रज्ञानामुळे आता शरीरापासून वेगळे झालेले भाग शस्त्रक्रियेद्वारे पुन्हा जोडता येतात. अपघातानंतर जास्त रक्तस्त्राव होत असताना, काही लोक नकळतपणे तो भाग फडक्यात गुंडाळून आणतात. पण जेव्हा शरीराच्या एखाद्या भागाला गंभीर दुखापत होते, तेव्हा तो भाग स्वच्छ कापडात गुंडाळून आणावा, असे त्यांनी सांगितले.

advertisement

अपघातानंतर आयुष्य होऊ शकतं पूर्ववत

अपघातामुळे हात किंवा पायाच्या नसा तुटल्यास, शरीराच्या दुसऱ्या भागातून नसा घेऊन त्या इथे पुन्हा जोडता येतात. शस्त्रक्रियेनंतर सहा महिन्यांनी याचे चांगले परिणाम दिसून येतात आणि आयुष्य पूर्वीसारखे सामान्य होते, असे त्या म्हणाल्या. त्यामुळे, असे अपघात घडल्यास, रुग्णाला शक्य तितक्या लवकर रुग्णालयात दाखल करावे, असे आवाहन त्यांनी केले. आता तंत्रज्ञान बदलत आहे, त्यामुळे प्रत्येकाने या संधीचा फायदा घ्यावा. अपघाताच्या वेळी खूप काळजी घेतली पाहिजे आणि जखमींना लवकरात लवकर रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तरच त्यांना अपंगत्वापासून वाचवता येईल, अन्यथा त्यांना आयुष्यभर अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल.

advertisement

हे ही वाचा : प्रेम केलं, संबंध ठेवले अन् गरदोर राहिली, पुढे 2 नवजात बाळांची हत्या केली, बाॅयफ्रेंडने उघड केला कांड!

हे ही वाचा : डोळ्यांत मिरचीपूड टाकली, गळ्यावर पाय दिला, प्रियकराच्या साथीने पत्नीने काढला पतीचा काटा, वाचा सविस्तर

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
भीषण अपघातात तुटलेला अवयव पुन्हा जोडता येतो का? डाॅक्टर सांगतात, "होय, पण..."
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल