वसई-विरार महापालिका क्षेत्रफळ सुमारे 380 चौरस किलोमीटर इतके असून येथे जवळपास 25 लाख लोकसंख्या वास्तव्यास आहे. गेल्या काही वर्षांत वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र रस्त्यांची क्षमता मर्यादित असल्याने नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. विशेषतहा शहराच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या मार्गांवर कोंडीची समस्या अधिक जास्त आहे.
ही समस्या सोडवण्यासाठी महापालिकेने रेल्वे उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव तयार करून एमएमआरडीएकडे पाठवला होता. त्यामध्ये उमेळमान (वसई), आचोळे, अलकापुरी (नालासोपारा) आणि विराटनगर (विरार) या चार उड्डाणपुलांचा समावेश होता. या प्रस्तावाला पश्चिम रेल्वेकडून मंजुरीही मिळाली होती.
advertisement
मात्र अलकापुरी आणि उमेळमान येथील पुलांसाठी आवश्यक जमीन खासगी, सरकारी आणि मिठागर क्षेत्रात येत असल्याने भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे सध्या विराटनगर आणि ओसवालनगरी येथे जमीन उपलब्ध असल्याने या दोन उड्डाणपुलांच्या कामाला निधी मंजूर करण्यात आला आहे.
हे उड्डाणपूल पूर्ण झाल्यानंतर विरार आणि नालासोपारा परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता असून नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे.
