
बीड : एकाच औषधाचा वारंवार वापर ही सध्या शेतीसमोरील गंभीर आणि दुर्लक्षित समस्या बनत चालली आहे. अनेक शेतकरी किडी आणि रोगांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी सतत तेच कीटकनाशक किंवा बुरशीनाशक वापरतात. सुरुवातीला याचा परिणाम दिसून येतो. मात्र कालांतराने त्याचे दुष्परिणाम समोर येऊ लागतात. यामुळे केवळ पिकांचेच नव्हे, तर संपूर्ण शेती परिसंस्थेचे मोठे नुकसान होते आणि दीर्घकालीन उत्पादनक्षमतेवर विपरीत परिणाम होतो, अशी माहिती बीड जिल्ह्यातील कृषी अभ्यासक महादेव बिक्कड यांनी दिली.