
अमरावती : अनेकांना शिळे अन्न खाण्याची सवय असते. विशेषतः महिलांवर शिळे अन्न खाण्याची वेळ जास्त येते. कारण अन्न वाया घालवणे योग्य नाही, म्हणून महिला ते खातात. पण, शिळे अन्न खाण्याचे अनेक दुष्परिणाम आहेत. अनेकवेळा अन्नातून विषबाधा होण्याची शक्यता असते. त्यामुळे लागेल तेवढेच अन्न बनवून आपले आरोग्य राखणे कधीही चांगले. पाहुयात, शिळे अन्न खाण्याचे दुष्परिणाम कोणकोणते आहेत