बीड हत्याप्रकरणात विजय वडेट्टीवारांनी गंभीर आरोप केलाय. आरोपींची मंत्र्यांकडे उठबस असल्याचे पुरावे समोर आलेत, त्यामुळे मंत्र्यांचा यात काही संबंध आहे का याची सखोल चौकशी करण्यात यावी. त्याचसह एसआयटी, सीआयडीनं प्रामाणिकपणे दबावाला बळी न पडता प्रकरणाच्या खोलाशी जाऊन शोध घ्यावा अशी मागणी वडेट्टीवारांनी केलीय. बीड प्रकरणी वडेट्टीवारांनी सरकारसह पोलिसांवर निशाणा साधलाय, बिहारलाही लाजवेल अशी घटना बीडमध्ये घडलीय. बीडप्रकरण म्हणजे महाराष्ट्र पोलिसांच्या अकार्यक्षमतेचा पुरावा आहे असं म्हणत विजय वडेट्टीवारांनी बीडप्रकरणी सरकारवर हल्लाबोल केलाय.