
धाराशिवमधील बार्शीतील उक्कडगावच्या महाविद्यालयात अकरावीच्या विद्यार्थ्याला बारावीच्या विद्यार्थ्यांनी रॅगिंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अकरावीतील विद्यर्थ्याने रुम मधील कचरा काढण्यास नकार दिला होता.त्यामुळे दारु पिऊन बारावीच्या विद्यार्थ्याने त्याचे रॅगिंग केले.जवळ येऊन एकाच कानाखाली सात ते आठ वेळा मारलं, त्यानंतर स्टंपने पायावर मारले. विद्यार्थ्याला तीन तास मारहाण केल्याचा आरोप विद्यार्थ्याने केला आहे. एवढं होऊन महाविद्यालय आरोपी विद्यार्थ्यांना पाठीशी घालत आहे.