
Bollywood Song : 'जीनियस' चित्रपटातील 'दिल मेरी ना सुने' हे गाणं आहे. चित्रपटात वासू नावाचा हुशार तरुण आहे, जो एका गुप्तहेर संघटनेत काम करत असतो. त्याला एका मिशनवर पाठवतात. तेव्हा त्याचे प्रेम नंदिनी नावाच्या मुलीवर होते. त्याचे मिशनवर असताना तो जखमी होतो आणि कोमात जातो. कोमातुन बाहेर आल्यावर त्याचा भूतकाळ तो विसरतो. काही काळानंतर त्याला आठवते. एम.आर.एन हा मुख्य खलनायक आहे, जो माजी गुप्तहेर असतो. ज्याच्यासोबत वासूचा शेवटी मोठा संघर्ष होतो. त्यात वासू विजय मिळवतो. हे गाणं आतिफ असलम यांनी गायले आहे. तर गाण्याला संगीत हिमेश रेशमिया यांचे आहे. तर गाण्याचे बोल हे मनोज मुंतशिर यांनी लिहिले आहे. चित्रपटात उत्कर्ष शर्मा, नवाजुद्दीकी सिद्दीकी, मिथुन चक्रवर्ती, आयेशा झुल्का आणि ईशिता चौहान यांनी मुख्य भूमिका केल्या आहेत.
Last Updated: Dec 16, 2025, 21:01 ISTयोजना, पैसे, सेवा अशा खाल्ल्याच्या अनेक घटना घडल्या असतील. पण राजकारणात एक अजबच घटना आज घडली. ती म्हणजे पुण्यात उमेदवारीत विरुद्ध उमेदवाराचा फॉर्मच गिळला. उद्धव कांबळे आणि मच्छिंद्र ढवळे असे दोन उमेदवारांचे नाव आहे.
Last Updated: Jan 01, 2026, 22:10 ISTभाजपाच्या उमेदवारी वरुन चाललेलं रणकंदन दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यातच आता चर्चेचा विषय म्हणजे पुण्यात पूजा मोरेंना खूपच ट्रोल केले आणि पुण्यात पदाधिकाऱ्यांच्या विरोधामुळे पूजा मोरे यांना अर्ज मागे घ्यावा लागला. त्यांनी दुसऱ्यावर अन्याय होऊ नये म्हणून माघार घेतली.
Last Updated: Jan 01, 2026, 21:30 ISTकृपाशंकर सिहांनी एक राजकीय विधान केले होते. त्यामुळे राजकीय चर्चेला मोठे उधान आले आहे. या घडामोडीत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका विरोधकांवर केली. त्यातच भाजप नितेश राणे हे एका सोशल मीडिया पोस्टमुळे विरोधकांकडून ट्रोल झाले आहेत.
Last Updated: Jan 01, 2026, 21:02 ISTछत्रपती संभाजीनगर : फुलंब्री तालुक्यातील शिरोडी खुर्द गावातील शेतकरी बाळकृष्ण आटोळे हे गेल्या 10 वर्षांपासून फुलशेती व्यवसायात आहेत. 30 गुंठे क्षेत्रामध्ये झेंडूची लागवड त्यांनी केली आहे. जळगाव, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आटोळे यांचा झेंडू पार्सलद्वारे विक्री केला जातो. या झेंडू फुलशेतीच्या माध्यमातून यंदाच्या पहिल्या 2 महिन्यातच 70 हजारांचे उत्पन्न मिळाले असल्याचे बाळकृष्ण आटोळे यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
Last Updated: Jan 01, 2026, 18:17 ISTपुणे: महाराष्ट्रभरात सध्या चांगलीच कडाक्याची थंडी जाणवत आहे. अनेक भागांत एक अंकी तापमानाचीही नोंद झाली आहे. थंडी सुरू झाली की अनेक जण गंमतीने म्हणतात, खोबरेल तेल आळून बसलं कीच खरी थंडी पडली असं समजायचं. विशेषत: घराघरांत वापरलं जाणारं पॅरॅशूट खोबरेल तेल थंडीत घट्ट होतं. मात्र, यामुळे अनेकांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो. खोबरेल तेल थंडीत आळून बसतं, पण बदाम तेल किंवा इतर खाद्यतेलांवर थंडीचा फारसा परिणाम का होत नाही? कितीही थंडी पडली तरी ही तेलं द्रवरूपातच का राहतात? खोबरेल तेल आळून बसण्यामागचं नेमकं कारण काय आहे आणि इतर तेलांवर त्याचा परिणाम का होत नाही, याविषयीच आपण जाणून घेणार आहोत.
Last Updated: Jan 01, 2026, 18:01 IST