आरक्षणाच्या मागणीवर मराठा समाजात एकमत नसल्याचं स्पष्ट झालंय. चिपळूणमधील क्षत्रिय मराठा मेळाव्यात, मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून आरक्षण नको, अशी भूमिका घेण्यात आली. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील मराठा आणि कुणबी एकच आहेत, यावर ठाम आहेत. परिणामी मराठा आरक्षणातला तिढा कसा सोडवायचा? असा प्रश्न आता निर्माण झालाय.