भारतीय संस्कृतीत तुळसला पवित्र स्थान देण्यात आलं आहे. प्रत्येक घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत लावलेली तुळस केवळ धार्मिक दृष्टिकोनातून नव्हे, तर आरोग्याच्या दृष्टीनेही अत्यंत उपयुक्त आहे. आयुर्वेदात तुळसला “औषधींची राणी” म्हटलं गेलं असून ती जवळपास शंभरहून अधिक आजारांवर उपयोगी ठरते. तज्ज्ञांच्या मते दररोज सकाळी दोन ते तीन ताज्या तुळशीची पानं खाल्ल्याने शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतात.