बीड: मेंदू हा मानवी शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव आहे. त्याच्या कार्यातील किंचितसा बिघाड देखील त्रासदायक ठरतो. मेंदूचे कार्य सुरळीत सुरू नसेल तर आपल्या एकूण मानसिक क्षमतेवर आणि आरोग्याव परिणाम होतो. सततचा तणाव, अपुरी झोप आणि अयोग्य आहार यामुळे मेंदूची कार्यक्षमता कमी होऊ शकते. मात्र, काही घरगुती नैसर्गिक उपायांमुळे आपण मेंदू तंदुरुस्त ठेवू शकतो. याबाबत लोकल 18ने बीड जिल्ह्यातील डॉक्टर झांजुर्णे यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली.