
अमरावती : थंडीच्या दिवसांत त्वचा कोरडी पडते, सांधे दुखतात, थकवा येतो, व्यवस्थित झोप लागत नाही. या सर्व तक्रारींमुळे अनेकजण त्रस्त असतात. अशावेळी आयुर्वेदाने सांगितलेला अभ्यंग हा उपाय अत्यंत फायदेशीर ठरतो. हिवाळ्यात अभ्यंग हा केवळ सौंदर्यासाठी नव्हे तर संपूर्ण आरोग्यासाठी आवश्यक आहे. नियमित अभ्यंगामुळे शरीर सुदृढ राहते, थंडीचा त्रास कमी होतो. आणखी काय फायदे होतात? हिवाळ्यात अभ्यंग का करावा, अभ्यंग म्हणजे नेमकं काय? याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.