
अभिनेता राजपाल यादव 9 कोटींच्या चेक बाऊन्स प्रकरणात सध्या जामिनावर तुरुंगातून बाहेर आहे. त्याच्या भाचीच्या लग्नासाठी त्याला जामीन देण्यात आला.वारंवार आश्वासन देऊनही पैसे न दिल्यामुळे दिल्ली उच्च न्यायालयाने त्याला फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले. राजपालने 5 फेब्रुवारी रोजी तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केलं.त्यानंतर त्याच्या कठिण काळात आता बॉलिवूडची साथ मिळाली असल्याचे समजते आहे.त्यामुळे राजपाल यादवला मोठा आधार मिळाला.