
महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान बुधवारी २८ जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झालं. ते मुंबईहून बारामतीच्या दिशेनं येत होते, दरम्यान बारामती विमानतळावर लँडींग करत असताना विमानाचा अपघात झाला. यात दादांसह एकूण पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. हा विमान अपघात धुक्यांमुळे झाल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र यावर आता विविध प्रकारचे संशय व्यक्त केले जात आहेत.