
सुनील तटकरे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, "ज्यादिवशी दुर्दैवी घटना घडली त्यादिवशीपासूनच तपासाला सुरुवात केली आहे. दुर्देवी विमान अपघाताच्या संदर्भात आधीच भारत सरकारने आधीच स्वायत्त संस्था नेमलेल्या आहेत. तपास यंत्रणेने तपास सुरु केलेल्याचे घोषित केले आहे.मुख्यमंत्री महोदयांनीही सीबीआय तपास करावा असा आदेश दिलेला आहे.आम्ही सखोल तपासाची मागणी केली आहे.लवकरात लवकर तपासणी व्हावी आणि जनतेसमोर यावं.म्हणूनच आम्ही मुख्यमंत्री महोदयांशी भेट घेतली."