
इराण-इस्रायल युद्धाची भारताच्या शेतकऱ्यांना मोठी झळ बसली आहे. अनेक शेतकऱ्यांचा शेतमाल निर्यात होऊ शकला नाही. त्यामुळे तो माल कमी भावात बाजारात दिला जात आहे. त्यातच आता धाराशिवमधील इराणला निर्यात होणारी केळी ही शेतातच पडून आहेत. त्यामुळे केळींचे खूपच नुकसान झाल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे शेतकरी खूपच चिंतेत असल्याचे दिसून आले आहे.