मुंबई: सात बेटांच्या समूहातून उभी राहिलेली मुंबई आज जगातील सर्वात महत्त्वाच्या महानगरांपैकी एक आहे. इंग्रज भारतात आल्यानंतर मुंबईला व्यापारी व औद्योगिक केंद्र म्हणून वेगळीच ओळख मिळाली. इंग्रजांच्या काळात बांधलेल्या असंख्य वास्तू, रस्ते, बाजारपेठा, तसेच सार्वजनिक ठिकाणे आजही शहराच्या इतिहासाची साक्ष देतात. मुंबई म्हणजे एक जिवंत ऐतिहासिक ठेवा. मात्र शहराच्या झपाट्याने वाढत्या विकासामुळे या वारशाचा मोठा भाग हळूहळू धोक्यात जात आहे. आधुनिक इमारती, नवे रस्ते आणि सतत बदलणाऱ्या जीवनशैलीमुळे जुने ठसे मिटू लागले आहेत. त्यामुळे मुंबईचा वारसा जतन करून तो पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणं ही काळाची गरज बनली आहे. याच पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय (CSMVS) यांनी एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. त्यांनी डिजिटल लायब्ररी आर्काइव्हची सुरुवात केली असून 2026 पर्यंत हे सर्वसामान्यांसाठी खुले होईल