
मुंबई: कधीही न थांबणाऱ्या मुंबई सारख्या शहरात आपल्याला माणसं नेहमीच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करताना दिसतात. सध्या या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला एक शांततेचे ठिकाण हवं असतं. मुंबईत जर शांतता शोधायची असेल तर उद्यान हा उत्तम पर्याय आहे. मुंबईमध्ये आपल्याला अनेक उद्यानं पाहायला मिळतात. पण चारही बाजूने झाडे झुडपे आणि हिरवळ तसेच मोठा परिसर लाभलेली उद्यानं फार कमी पाहायला मिळतात.