
काही मैल अंतर पार केलं की संस्कृती आणि बोली भाषा बदलते असं म्हटलं जातं. महाराष्ट्रातील मराठी भाषेत अनेक बोली भाषांचा समावेश आहे. त्यामुळे भाषेच्या समृध्दीत मोठी भर पडली आहे. याच मराठी भाषेत फार मोठ्या गोष्टींचा अर्थ एक वाक्य, म्हणी किंवा वाक्प्रचारतून व्यक्त होतो. अशा अनेक म्हणी आणि वाक्प्रचार आजही बोलताना वापरले जातात. मात्र त्या मागे नेमका इतिहास आणि त्याची उत्पत्ती कशावरून झाली हे जाणणे अधिक उत्सुकतेचे असते. अशीच एक म्हण म्हणजे 'गेला बाराच्या भावात' ही होय.