
नाशिक: हिंदू धर्मात मुल जन्माल्यापासून ते त्याच्या मृत्यूपर्यंत एकून 16 संस्कार सांगण्यात आले आहेत. या प्रत्येक संस्काराच्या मागे काही अध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारणं देण्यात आली आहेत. त्यापैकीच एक बाळाचे कान टोचणे हे आहे. मग मुलगा असो वा मुलगी हिंदू धर्मात दोघांचेही लहानपणीच कान टोचून म्हणजेच कर्णवेध संस्कार करून त्यात कानातले घातले जातात. याबाबत नाशिक येथील महंत अनिकेत शास्त्री यांनी माहिती दिलीये.