दिल्ली: "विलंब हा विकासाचा शत्रू आहे. मी रामेश्वरममध्ये पांबन पुलाचे उद्घाटन केले. देशाने वर्षानुवर्षे त्याची वाट पाहिली पण पूर्वीच्या सरकारांनी तो बांधला नाही. मागील सरकारांनी प्रकल्पांना विलंब केला, आम्ही तो बदलला. विलंब हा विकासाचा शत्रू आहे, आम्ही या शत्रूला पराभूत करण्याची शपथ घेतली आहे," असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.