
प्रमोद पाटील, नवी मुंबई : नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्थानकात एक प्रवाशी एका प्लॅटफॉर्म वरून दुसऱ्या प्लॅटफॉर्म जाताना पादचारी पुलाचा वापर न करता ट्रॅक वरून गेला. मात्र ट्रॅक पार करण्याआधीच लोकल आली आणि एकच खळबळ उडाली. चालकाने अनेक हॉर्न दिले गाडीला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही सदर प्रवाशी रेल्वे खाली आलाच. प्लॅटफॉर्म आणि गाडीच्या मध्ये अडकला. त्यावेळी प्लॅटफॉर्मवर उभ्या प्रवाशांना तो जिवंत असल्याचे लक्षात येताच चालकाला लक्षात आणून दिले. मात्र गाडीची आणि त्याची स्थिती अशी होतो की चालक गाडी ना पुढे घेऊ शकत होता ना मागे, शेवटी उपस्थित प्रवाशी आणि रेल्वे कर्मचारी यांनी मिळून गाडीला अक्षरशः उचललं आणि अडकलेल्या प्रवाशाला बाहेर काढलं. प्रवाशाला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती ठीक असल्याचं सांगितलं जात आहे. सदरची घटना सोमवारी दुपारी 3 वाजता घडल्याचं रेल्वे पोलिसांनी सांगितलं. या घटनेने एकीचे बळ काय असते याचे प्रत्यय दाखवून दिले.
Last Updated: Feb 08, 2024, 19:04 ISTयोजना, पैसे, सेवा अशा खाल्ल्याच्या अनेक घटना घडल्या असतील. पण राजकारणात एक अजबच घटना आज घडली. ती म्हणजे पुण्यात उमेदवारीत विरुद्ध उमेदवाराचा फॉर्मच गिळला. उद्धव कांबळे आणि मच्छिंद्र ढवळे असे दोन उमेदवारांचे नाव आहे.
Last Updated: Jan 01, 2026, 22:10 ISTभाजपाच्या उमेदवारी वरुन चाललेलं रणकंदन दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यातच आता चर्चेचा विषय म्हणजे पुण्यात पूजा मोरेंना खूपच ट्रोल केले आणि पुण्यात पदाधिकाऱ्यांच्या विरोधामुळे पूजा मोरे यांना अर्ज मागे घ्यावा लागला. त्यांनी दुसऱ्यावर अन्याय होऊ नये म्हणून माघार घेतली.
Last Updated: Jan 01, 2026, 21:30 ISTकृपाशंकर सिहांनी एक राजकीय विधान केले होते. त्यामुळे राजकीय चर्चेला मोठे उधान आले आहे. या घडामोडीत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका विरोधकांवर केली. त्यातच भाजप नितेश राणे हे एका सोशल मीडिया पोस्टमुळे विरोधकांकडून ट्रोल झाले आहेत.
Last Updated: Jan 01, 2026, 21:02 ISTछत्रपती संभाजीनगर : फुलंब्री तालुक्यातील शिरोडी खुर्द गावातील शेतकरी बाळकृष्ण आटोळे हे गेल्या 10 वर्षांपासून फुलशेती व्यवसायात आहेत. 30 गुंठे क्षेत्रामध्ये झेंडूची लागवड त्यांनी केली आहे. जळगाव, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आटोळे यांचा झेंडू पार्सलद्वारे विक्री केला जातो. या झेंडू फुलशेतीच्या माध्यमातून यंदाच्या पहिल्या 2 महिन्यातच 70 हजारांचे उत्पन्न मिळाले असल्याचे बाळकृष्ण आटोळे यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
Last Updated: Jan 01, 2026, 18:17 ISTपुणे: महाराष्ट्रभरात सध्या चांगलीच कडाक्याची थंडी जाणवत आहे. अनेक भागांत एक अंकी तापमानाचीही नोंद झाली आहे. थंडी सुरू झाली की अनेक जण गंमतीने म्हणतात, खोबरेल तेल आळून बसलं कीच खरी थंडी पडली असं समजायचं. विशेषत: घराघरांत वापरलं जाणारं पॅरॅशूट खोबरेल तेल थंडीत घट्ट होतं. मात्र, यामुळे अनेकांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो. खोबरेल तेल थंडीत आळून बसतं, पण बदाम तेल किंवा इतर खाद्यतेलांवर थंडीचा फारसा परिणाम का होत नाही? कितीही थंडी पडली तरी ही तेलं द्रवरूपातच का राहतात? खोबरेल तेल आळून बसण्यामागचं नेमकं कारण काय आहे आणि इतर तेलांवर त्याचा परिणाम का होत नाही, याविषयीच आपण जाणून घेणार आहोत.
Last Updated: Jan 01, 2026, 18:01 IST