आयएमएफ कार्यकारी मंडळाची विस्तारित निधी सुविधा (ईएफएफ) आणि मजबूती व स्थिरता सुविधेअंतर्गत पहिल्या आढाव्यासाठी 9 मे रोजी पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांशी बैठक होणार आहे. भारताने शुक्रवारी म्हटले होते की, 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला दिलेल्या निधी आणि कर्जावर पुनर्विचार करण्याची मागणी ते आयएमएफसह जागतिक बहुपक्षीय संस्थांकडे करतील. या हल्ल्यात 26 लोक मारले गेले होते आणि भारताला पाकिस्तानला राजनैतिक स्तरावर घेरण्याची इच्छा आहे.
advertisement
अमेरिकेतून आली मोठी बातमी, ट्रम्प काही तरी खळबळजनक करण्याच्या तयारीत
पाकिस्तानला एकाकी पाडण्याचा प्रयत्न
एक्सप्रेस ट्रिब्यूनमधील अधिकाऱ्यांच्या मते, आयएमएफला सामील करण्याचा भारताचा प्रयत्न हा पाकिस्तानला राजनैतिक स्तरावर एकाकी पाडण्याच्या त्यांच्या राजकीय अभियानाचा विस्तार आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी पहलगाममधील नरसंहारामागे पाच दहशतवाद्यांची ओळख पटवली आहे. ज्यामध्ये तीन पाकिस्तानी नागरिक असल्याचे सांगितले जात आहे.
पाकिस्तानने हे आरोप फेटाळले आहेत आणि निष्पक्ष आंतरराष्ट्रीय चौकशीची मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 एप्रिल रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्यामागील दहशतवादी आणि षड्यंत्रात सामील असलेल्यांना त्यांच्या कल्पनेपलीकडील शिक्षा देण्याची शपथ घेतली.
संपूर्ण देश स्तब्ध, तीन वर्षांच्या मुलीचा संथारा, लगेच प्राणत्याग
ते म्हणाले की, देशाच्या दुश्मनांनी केवळ निशस्त्र पर्यटकांनाच लक्ष्य केले नाही, तर भारताच्या आत्म्यावर हल्ला करण्याचे धाडस केले. सरकारी सूत्रांनुसार 29 एप्रिल रोजी उच्च संरक्षण अधिकाऱ्यांसोबत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत मोदी यांनी यावर जोर दिला की, दहशतवादी हल्ल्यावर भारताच्या प्रतिक्रियेची पद्धत, लक्ष्य आणि वेळ ठरवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य सशस्त्र दलांना आहे.
दरम्यान, वृत्तपत्राने पाकिस्तानच्या वित्त मंत्रालयाच्या एका सल्लागाराच्या हवाल्याने शुक्रवारी सांगितले की, देशाला गेल्या वर्षी मिळालेले सात अब्ज डॉलरचे आयएमएफ मदत पॅकेज योग्य मार्गावर आहे. इस्लामाबादला मार्च 2025 मध्ये हवामान लवचिकता निधीद्वारे अतिरिक्त 1.3 अब्ज डॉलर देखील मिळाले आहेत.
