दरवर्षी देशभरातून लाखो यूपीएससी परीक्षेची तयारी करतात आणि पहिल्या टप्प्यात फक्त काही हजार लोक निवडले जातात. तर अंतिम टप्प्यासाठी म्हणजेच मुलाखतीसाठी एक ते दोन हजार उमेदवारांची निवड केली जाते जी पूर्णपणे उपलब्ध पदांच्या संख्येवर अवलंबून असते. इथं लोक आयएससारख्या अधिकारी पदांवर नोकरी मिळवण्यासाठी खूप उत्सुक आहेत. ही परीक्षा खूप कठीण असते आणि अनेकांना दुसरं करिअर निवडावं लागतं. व्हिडिओमध्ये असंच एक जोडपं दाखवण्यात आलं आहे ज्यामध्ये पती-पत्नी दोघंही यूपीएससी परीक्षेसाठी उमेदवार आहेत. ज्यांनी आपल्या बाळाचं नावही यूपीएससी ठेवलं आहे.
advertisement
'भिकारी'च्या 3-3 बायका, सगळ्यांना ठेवतो खूश, सांभाळतो कशा? पद्धत पाहून पोलीसही अवाक
व्हिडिओमध्ये आपल्याला एक जोडपं उभं असलेलं दिसतं, ज्यामध्ये तो माणूस हातात एक मूल धरून आहे. एका पत्रकाराने त्याला विचारलं की तू तुझ्या मुलाचं नाव यूपीएससी का ठेवलं? तो माणूस म्हणतो की तो आणि त्याची पत्नी दोघंही यूपीएससीची तयारी करत होते आणि दोघंही UPSC उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. म्हणजेच दोघंही त्या परीक्षेत यशस्वी होऊ शकले नाहीत.
व्हिडिओमध्ये तो माणूस सांगतो की दोघांनी लग्न केलं आणि त्यांच्या मुलाचं नाव यूपीएससी ठेवलं. त्यामुळे ते आता लोकांना सांगू शकतात की, “आम्ही देखील UPSC उत्तीर्ण झालो आहोत”, याचा अर्थ असा की त्यांना UPSC नावाचं एक मूल आहे. पण लोक सामान्यतः यूपीएससी उत्तीर्ण होण्याचा अर्थ परीक्षेतील यशाशी जोडतात.
हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अरविंद श्रीदेवी युझरने @arvind.sridevi या अकाउंटवरून शेअर केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, "यूपीएससी घोषित करण्यात आलं आहे."
कुणी मुलगा देतं का! या गावात 600 मुली, सगळ्या अविवाहित, नवरा सोडा, BFही मिळेना, कारणही अजब
हा मजेदार व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे आणि लोकांनी या जोडप्याला खूप शुभेच्छाही दिल्या आहेत. एका युझरने लिहिलं, “भाऊ, तू जेईई आणि नीट परीक्षा कधी देत आहेस?” एकाने लिहिलं, “बरोबर आहे, यामध्ये निवृत्तीची कोणतीही शक्यता किंवा धोका नाही.” तर काही लोकांनी की यूपीएससीची थट्टा केली जात असल्याची टीकाही केली आहे.