कर्जबाजारी शेतकरी ते करोडपती
नागेशचे आयुष्य 2010 पूर्वी खूपच संघर्षमय होते. तीन एकर शेतीत तो ऊस, बटाटा आणि भाताची शेती करत होता. पण अपेक्षित नफा मिळत नसल्याने त्याच्यावर मोठे कर्ज झाले होते. या संकटातून बाहेर पडण्यासाठी त्याने कोबी लागवडीचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला. आज 15 वर्षांच्या मेहनतीनंतर त्याने 1 कोटींहून अधिक नफा कमावला आहे.
advertisement
शेअर बाजारातील ATM मशीन, आयुष्यभर पैसा छापाल; ११ मार्चआधी खरेदी हा शेअर करा
कर्जमुक्त झाल्यानंतर नागेशने 80 लाख रुपयांत गावात दोन एकर जमीन विकत घेतली. इतकेच नव्हे, तर पत्ता कोबीच्या शेतीतून मिळालेल्या पैशांतून त्याने आपल्या भावा-बहिणींच्या लग्नाचा खर्च केला आणि स्वतःच्या घरासाठी 6.5 लाख रुपये खर्च करून घर बांधले. आपल्या यशाचे प्रतीक म्हणून त्याने घरावर 'सर्व कोबीचे पुण्याई' असे लिहून ठेवले आहे.
स्वतःची नर्सरी तयार केली – खर्च वाचवून जादा नफा
नागेशने गेल्या तीन वर्षांत स्वतःची नर्सरी तयार केली आहे. त्यासाठी त्याने आपली जमीनच बियाणे रोपवाटीकेसाठी वापरली. मला दरवर्षी 1 लाख 80 हजार रोपांची गरज असते. जर ते बाहेरून खरेदी केले असते, तर एका रोपासाठी 60 पैसे मोजावे लागले असते. पण स्वतःच रोपे तयार केल्याने हा खर्च फक्त 20 पैसे प्रति रोप इतका कमी झाला आणि मोठी बचत झाली, असे नागेशने सांगितले.
शेअर बाजारात बॉटम आउट, अजून मोठा क्रॅश; पण Expert दाखवला आशेचा किरण, पुढील...
तीन महिन्यांत मोठी कमाई!
एका एकरात सुमारे 40 हजार रोपे लावली जातात आणि त्यातून 25-30 टन उत्पादन मिळते. तीन महिन्यांत पत्ता कोबी विक्रीसाठी तयार होते. कीड व रोगांपासून बचाव करण्यासाठी पाच ते सहा वेळा कीटकनाशकांचा वापर केला जातो आणि दर आठ दिवसांनी पाणी दिले जाते, असे नागेशने सांगितले.
असा आहे नफा
-एका एकरासाठी अंदाजे 40,000 रुपये खर्च होतो.
-व्यापारी थेट शेतात येऊन उत्पादन खरेदी करतात, त्यामुळे वाहतूक आणि बाजारातील खर्च वाचतो.
-एका हंगामात (तीन महिन्यांत) 1.3 लाखांपर्यंत नफा मिळतो.
-सहा महिन्यांत तीन वेळा आणि एकूण पाच एकरात उत्पादन घेतल्याने मोठा नफा मिळतो.
-कृषी क्षेत्रातही करोडोंची कमाई शक्य!
शेअर बाजारात विनाशकाळ, पैसा लावणे मोठी चूक; गुंतवणूकदाराने केली भविष्यवाणी
नागेशने आपल्या कष्ट आणि हुशारीच्या जोरावर शेतीतून करोडोंचा नफा कमावला आहे. त्यांचा हा प्रवास आजच्या तरुण शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. शेतीतही मोठे यश मिळवता येते आणि योग्य नियोजन केल्यास ती फायद्याची ठरू शकते,हेच नागेशने सिद्ध केले आहे.