या घटनेनंतर बिघडलं मानसिक संतूलन
मुकेशचे वडील श्री लाल बैरवा यांनी लोकल 18 ला सांगितलं की, त्यांच्या मुलाचं लग्न सुमारे 12 वर्षांपूर्वी झालं होतं आणि काही काळानंतर त्याला एक दिव्यांग मुलगा झाला. त्या घटनेनंतर मुकेशचं मानसिक संतुलन बिघडलं. हळूहळू तो लोकांना दगड मारू लागला, शिव्या देऊ लागला आणि मारहाण करू लागला. घर रस्त्याच्या कडेला असल्यामुळे ये-जा करणाऱ्या लोकांना सतत त्रास होऊ लागला.
advertisement
10 वर्षांपासून खोलीत कैद
परिस्थिती हाताबाहेर जात आहे, हे पाहून कुटुंबीयांनी मुकेशला घराच्या एका खोलीत लोखंडी साखळीने बांधून ठेवलं. गेल्या 10 वर्षांपासून मुकेश त्याच खोलीत कैद आहे. ना पंख्याची हवा, ना बाहेर फिरण्याची मुभा, अगदी अन्न आणि पाणीसुद्धा त्याचे कुटुंबीय त्याला दारातूनच देतात. श्री लाल बैरवा स्वतः कर्करोगासारख्या गंभीर आजाराने त्रस्त आहेत. त्यांनी सांगितलं की, त्यांनी आपल्या मुलावर अनेकवेळा उपचार करण्याचा प्रयत्न केला, पण गंभीर आर्थिक संकटामुळे उपचार शक्य झाला नाही. आता ते सरकार आणि प्रशासनाकडे आपल्या मुलावर उपचार करण्यासाठी मदतीची याचना करत आहेत, जेणेकरून तो पुन्हा सामान्य जीवन जगू शकेल आणि या कैदतून त्याला मुक्ती मिळेल.
सामाजिक संवेदनशीलतेची अपेक्षा
हे प्रकरण केवळ एका कुटुंबाच्या दुःखाचं उदाहरण नाही, तर मानसिक आरोग्य सेवांच्या गंभीर कमतरतेचं आणि सामाजिक संवेदनशीलतेची परीक्षा घेणारं आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे, जेणेकरून मुकेशसारख्या पीडितांना वेळेवर उपचार मिळू शकेल आणि ते सन्मानाचं जीवन जगू शकतील.
हे ही वाचा : "हॅलो, तुमची आई जिवंत आहे", 24 वर्षांनंतर मुलाला कळलं अन् धावत निघाला बंगालपासून राजस्थानपर्यंत...
हे ही वाचा : वडील-मुलगी, सासरा-सून, शिक्षक-विद्यार्थी... यांच्यात अनैतिक संबंध का निर्माण होतात? मानसशास्त्र काय सांगतं?