भारतात एक असा बाजार आहे जो एका खास कारणामुळे चर्चेत असतो. असं म्हटलं जातं की या बाजारात दगडही सोन्याच्या किमतीला विकला जातो. तुम्हाला कचरा वाटणाऱ्या वस्तूंसाठीही खरेदीदार मिळतील. आश्चर्यकारक म्हणजे निरुपयोगी मानल्या जाणाऱ्या वस्तूंना इथं चांगली किंमत मिळते. अगदी लिंबाच्या वाळलेल्या सालींनाही.
India National Animal : भारतात गाईची पूजा करतात मग ती भारताचा राष्ट्रीय प्राणी का नाही, वाघच का?
advertisement
शेतकऱ्यांसाठी तर ही एक आवडती बाजारपेठ आहे. या बाजारात तुम्हाला शेतकरी विविध वस्तू विकत असल्याचं दिसून येईल.
इथं काय काय विकलं जातं?
तुमच्या घराभोवती अनेक कडुलिंबाची झाडं असतील. त्यांची पानं वाळल्यानंतर फेकून दिली जातात. पण या बाजारात शेतकरी ही पानंदेखील विकतात. वाळलेल्या कडुलिंबाची पानं इथं पोत्यांमध्ये भरून विकली जातात. ही पानं इथं एक हजार ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलला विकली जातात. याशिवाय या बाजारात शेवग्याची पानंदेखील मोठ्या प्रमाणात विकली जातात. त्यांची किंमत प्रति क्विंटल दहा हजार रुपयांपर्यंत जाते.
या बाजारात वाळलेल्या कढीपत्त्याची पानंही मोठ्या प्रमाणात विकली जातात. ती प्रति क्विंटल सात हजार तुकड्यांना विकली जातात. मेंदीची पानंही बाजारात मोठ्या प्रमाणात विकली जातात. त्यांच्या किमती पानांच्या गुणवत्तेवर अवलंबून असतात. बऱ्याचदा भृंगराज शेतकऱ्यांच्या शेतात तणाप्रमाणे वाढतात. ते या बाजारातही खरेदी केलं जातं.
Alcohol : देशी आणि इंग्रजी दारू, बनवण्याची पद्धत सारखीच; मग एक स्वस्त, दुसरी महाग, असं का?
लोक इथं वाळलेलं गवत आणि पेंढादेखील विकतात. याशिवाय इथं वाळलेल्या लिंबाच्या सालीही विकल्या जातात. त्यांचा वापर औषधांमध्ये केला जातो. त्यामुळे इथून खरेदी केल्यानंतर लोक महागड्या वस्तूंमध्ये त्यांचा वापर करतात.
कुठे आहे हे मार्केट?
आता हे मार्केट कुठे आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल. तर हे मार्केट आहे मध्य प्रदेशमध्ये. नीमच मंडी असं या मार्केटचं नाव आहे. तुम्ही मध्य प्रदेशला गेला आणि या बाजाराला भेट दिली आहे का? तुमचा तिथला अनुभव कसा आहे? आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि नसेल गेला तर कधी मध्य प्रदेशला गेलात तर या बाजारात नक्की जा.
