आजपासून पितृपक्षाला सुरवात! पुढील 15 दिवसांत 6 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा पितर नाराज होणार

Last Updated:

Pitru Paksha 2025 : हिंदू सनातन धर्मात पितृपक्षाला (Pitru Paksha) अत्यंत पवित्र मानले जाते. यावर्षी पितृपक्षाची सुरुवात आजपासून 7 सप्टेंबर 2025 पासून होत आहे. पुढील पंधरा दिवसांपर्यंत म्हणजेच अमावास्येपर्यंत हा कालखंड चालणार आहे.

pitru paksha 2025
pitru paksha 2025
मुंबई : हिंदू सनातन धर्मात पितृपक्षाला (Pitru Paksha) अत्यंत पवित्र मानले जाते. यावर्षी पितृपक्षाची सुरुवात 7 सप्टेंबर 2025 पासून होत आहे. पुढील पंधरा दिवसांपर्यंत म्हणजेच अमावास्येपर्यंत हा कालखंड चालणार आहे. श्रद्धा आणि मान्यतेनुसार, या दिवसांत पितर आपल्या वंशजांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर येतात. त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी यासाठी कुटुंबीयांकडून श्राद्ध, तर्पण, पिंडदान आणि दानधर्म केले जातात.
पितृपक्षात योग्य रीतीने केलेले तर्पण आणि श्राद्ध विधी हे पितरांना प्रसन्न करतात. असे मानले जाते की, या काळात विधीवत पूजा केल्यास वंशवृद्धी, सुख, शांती, समृद्धी आणि आयुष्यातील अडथळे दूर होतात. परंतु वैदिक शास्त्रांमध्ये या काळासाठी काही नियम सांगितले आहेत. यांचे पालन न केल्यास पितर रुष्ट होतात, असेही धर्मग्रंथात नमूद आहे. त्यामुळे पितृपक्षात काय करावे आणि काय करू नये, याकडे विशेष लक्ष द्यावे.
advertisement
पितृपक्षात काय करावे?
पितरांच्या श्राद्धासाठी काळ्या तिळाचा वापर करावा. हा तिळ तर्पणासाठी अत्यंत शुभ मानला जातो. श्राद्ध व तर्पणाची वेळ दुपारची सर्वाधिक उत्तम मानली जाते. यावेळी केलेल्या विधींना विशेष फल मिळते. श्राद्धासाठी बनवलेले अन्न शिजवताना स्वच्छता राखणे आवश्यक आहे. अन्न शिजल्यानंतर ते प्रथम पितरांना अर्पण करावे, त्यानंतरच घरातील सदस्यांनी ग्रहण करावे. या काळात घरात आलेल्या गाय, कुत्रा, ब्राह्मण किंवा भिकाऱ्याला आदराने अन्नदान करणे हे अत्यंत पुण्यदायी मानले जाते.
advertisement
पितृपक्षात काय टाळावे?
या कालावधीत शुभकार्य करणे जसे की विवाह, गृहप्रवेश, नवा व्यवसाय किंवा मोठी खरेदी करणे अशुभ मानले जाते. पितृपक्षात खोटे बोलणे, वाईट शब्द वापरणे किंवा अपशब्द उच्चारणे टाळावे. असे केल्यास पितर रुष्ट होतात. मद्यपान, मांसाहार, कांदा, लसूण, वांगी, मुळा, दुधी, शिळे अन्न, मसूर डाळ, काळं मीठ आणि पांढरे तीळ यांचा उपयोग निषिद्ध मानला जातो. श्राद्धासाठी बनवलेले अन्न लोखंडाच्या भांड्यात शिजवू नये आणि पितरांसाठी बनवलेले अन्न आधी चाखू नये.
advertisement
पितृपक्ष हा केवळ धार्मिक कालखंड नसून तो आपल्या पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांच्या आठवणींना जागवण्याचा एक मार्ग आहे. या दिवसांत केलेल्या दान, तर्पण व श्राद्धकर्मामुळे पितरांच्या आत्म्याला शांती मिळते, असे मानले जाते. त्यामुळे श्रद्धा, नियम व शास्त्रांचा आदर ठेवून हा कालावधी पवित्रतेने पाळावा, हा संदेश धर्मशास्त्र आपल्याला देतात.
एकंदरीत, पितृपक्ष हा आपल्या पिढ्यांच्या स्मृतींना अर्पण केलेला काळ आहे. या काळातील आचरण व श्रद्धेने केवळ पितरांचे आशीर्वाद मिळत नाहीत, तर घरातील सुख-समृद्धीलाही चालना मिळते.
मराठी बातम्या/राशीभविष्य/
आजपासून पितृपक्षाला सुरवात! पुढील 15 दिवसांत 6 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा पितर नाराज होणार
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement