खाण्यापासून ते झोपण्यापर्यंत! चंद्र ग्रहणाच्या काळात तुम्हाला 6 नियम पाळावेच लागणार, अन्यथा संकट निश्चित
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Chandra Grahan 2025 : खगोलीय दृष्टिकोनातून पाहिले तर चंद्रग्रहण ही एक विलक्षण घटना आहे. पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मधोमध येते तेव्हा सूर्यकिरण चंद्रावर पोहोचू शकत नाहीत आणि त्यामुळे चंद्रावर सावली पडते.
मुंबई : खगोलीय दृष्टिकोनातून पाहिले तर चंद्रग्रहण ही एक विलक्षण घटना आहे. पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मधोमध येते तेव्हा सूर्यकिरण चंद्रावर पोहोचू शकत नाहीत आणि त्यामुळे चंद्रावर सावली पडते. या घटनेलाच चंद्रग्रहण म्हणतात. धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार हा काळ संवेदनशील मानला जातो. हिंदू धर्मात ग्रहणकाळात सुतक पाळण्याची परंपरा आहे, तर खगोलशास्त्रज्ञांसाठी ही अभ्यासाची उत्तम संधी असते. या वर्षीचे दुसरे व शेवटचे चंद्रग्रहण आज, 7 सप्टेंबर 2025 रोजी घडत असून भारतासह जगातील अनेक देशांतून ते स्पष्टपणे पाहता येईल.
चंद्रग्रहण कुठे दिसणार?
भारताबरोबरच ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, आफ्रिका, आशिया, युरोप, पश्चिम व उत्तर अमेरिका तसेच दक्षिण अमेरिकेच्या काही भागांतून हे ग्रहण दृश्यमान होईल. त्यामुळे या घटनेकडे खगोलप्रेमींसह धार्मिक लोकांचाही मोठा उत्साह आहे.
सुतक कालावधी
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहण सुरू होण्याच्या नऊ तास आधी सुतक काळ लागतो. त्यामुळे 7 सप्टेंबर रोजी दुपारी 12:59 पासून सुतक सुरू होईल आणि ग्रहण संपेपर्यंत चालू राहील. या काळात देवपूजा, प्रवास, अन्नसेवन, केस-नखे कापणे, स्वयंपाक इत्यादी कामे टाळण्याचा सल्ला दिला जातो. विशेषतः गर्भवती महिलांनी आकाशाकडे पाहू नये आणि बाहेर जाणे टाळावे, असेही सांगितले जाते.
advertisement
ज्योतिषशास्त्रीय परिणाम
या ग्रहणावेळी शनी कुंभ राशीत तर चंद्र पूर्वाभाद्रपद नक्षत्रात असेल. राहू-चंद्राच्या युतीमुळे ग्रहण योग तयार होत आहे. ज्योतिषांच्या मते, या योगामुळे काही राशींवर विशेष परिणाम होणार आहे.
मेष, वृषभ, कन्या आणि धनु राशीसाठी हा काळ शुभ मानला जातो. या राशींना आर्थिक लाभ, करिअरमध्ये प्रगती, वैवाहिक जीवनात समाधान आणि गुंतवणुकीत यश मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
मिथुन, कर्क, सिंह, तूळ, वृश्चिक, मकर, कुंभ आणि मीन राशींनी मात्र खबरदारी घ्यावी. नवीन काम सुरू करण्यास विलंब करावा, प्रवास टाळावा आणि महत्त्वाची माहिती कोणाशीही शेअर करू नये, असा सल्ला दिला जातो. व्यवसायातील अडचणी वाढू शकतात.
काय करावे आणि काय करू नये
ग्रहणकाळात झोपणे, अन्नसेवन करणे किंवा धार्मिक मूर्तींना स्पर्श करणे टाळावे. शरीरावर तेल लावणे, खरेदी करणे किंवा सुयांशी संबंधित कामे करणेही अशुभ मानले जाते. त्याऐवजी या काळात मंत्रजप व ध्यान करणे शुभ मानले जाते.
advertisement
ग्रहणकाळातील मंत्रजप
धार्मिक परंपरेनुसार खालील मंत्रांचे जप केल्याने सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते.
विष्णु गायत्री मंत्र – “ॐ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात।”
विष्णु बीज मंत्र – “ॐ ब्रिम बृहस्पतये नमः।”
महामृत्युंजय मंत्र – “ॐ त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम्...”
दारमान, एकूणच 7 सप्टेंबर रोजीचे हे चंद्रग्रहण धार्मिकदृष्ट्या महत्वाचे, खगोलशास्त्रज्ञांसाठी अभ्यासाची संधी आणि ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींसाठी लाभदायक, तर काहींसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. योग्य नियमांचे पालन आणि मंत्रजपाद्वारे या काळात सकारात्मकता राखता येईल.
advertisement
(सदर बातमी फक्त माहिती करिता आहे. न्यूज 18 मराठी कुठलाही दावा करत नाही)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 07, 2025 10:07 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
खाण्यापासून ते झोपण्यापर्यंत! चंद्र ग्रहणाच्या काळात तुम्हाला 6 नियम पाळावेच लागणार, अन्यथा संकट निश्चित