स्वातंत्र्याच्या वेळी सैन्याची विभागणी कशी झाली? भारताला किती सैनिक मिळाले आणि किती पाकिस्तानात गेले?

Last Updated:

Independence and Partition 1947: भारताच्या फाळणीसोबतच सैन्याचाही विभाजन झाला. ब्रिटिश भारतीय सैन्यातील जवळपास 3 लाख 91 हजार सैनिकांपैकी दोन तृतीयांश भारताला मिळाले, तर एक तृतीयांश पाकिस्तानच्या वाट्याला गेले.

News18
News18
भारताच्या स्वातंत्र्यासाठीचा प्रदीर्घ लढा 1857 च्या उठावापासून सुरू झाला होता आणि दुसऱ्या महायुद्धानंतर (1939-1945) अधिक तीव्र झाला. युद्धकाळात भारतीयांनी दिलेल्या योगदानाच्या बदल्यात स्वशासनाची आशा बळावली होती. 1945 मध्ये निवडून आलेल्या नव्या ब्रिटीश सरकारने अखेर भारताला स्वातंत्र्य देण्याचा निर्णय घेतला. त्यांना आशा होती की, ते एक अखंड भारत मागे सोडून जातील, परंतु भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात नवनिर्मित राष्ट्राच्या स्वरूपावर सहमती होऊ शकली नाही.
फाळणीची प्रक्रिया आणि महत्त्वाचे निर्णय
1946 मध्ये झालेल्या आणखी एका अयशस्वी परिषदेच्या नंतर, मुस्लिम लीगचे नेते मोहम्मद अली जिन्ना यांनी स्वतंत्र मुस्लिम राष्ट्रासाठी थेट संघर्ष सुरू केला. अखेरीस, ब्रिटीशांना भारताच्या फाळणीशिवाय दुसरा पर्याय उरला नाही. भारताचे शेवटचे व्हाइसरॉय लॉर्ड लुईस माउंटबॅटन यांनी 2 जून 1947 रोजी जाहीर केले की, भारताला हिंदू बहुल भारत आणि मुस्लिम बहुल पाकिस्तानमध्ये विभाजित केले जाईल. यामध्ये पश्चिम पाकिस्तान (सध्याचा पाकिस्तान) आणि पूर्व पाकिस्तान (सध्याचा बांगलादेश) असे दोन भौगोलिकदृष्ट्या वेगळे भाग असतील.
advertisement
भारतीय सैन्याचे विभाजन
फाळणीमुळे भारतीय सैन्यातही फूट पडली. लॉर्ड माउंटबॅटन यांनी सैन्य विभाजनाविरोधात भूमिका घेतली होती. त्यांनी जिन्नांना भारतीय सैन्य एका इंग्रज कमांडरच्या नेतृत्वाखाली ठेवण्याचा प्रस्ताव दिला, जो भारत आणि पाकिस्तान दोघांसाठी जबाबदार असेल. मात्र, जिन्नांनी हा प्रस्ताव त्वरित फेटाळला आणि सैन्याच्या विभाजनावर ठाम राहिले.
स्वातंत्र्याची तारीख 15 ऑगस्ट 1947 निश्चित करण्यात आली आणि ब्रिटिश सैनिकांना त्यांच्या छावण्यांमध्ये परत बोलावण्यात आले. ब्रिटीश वकील सर सिरिल रॅडक्लिफ यांना भारत आणि पाकिस्तानमधील सीमारेषा ठरवण्याची जबाबदारी देण्यात आली. 14 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिश भारतीय सैन्याच्या विघटनाचा आदेश काढण्यात आला आणि त्यावर फील्ड मार्शल क्लॉड ऑचिनलेक व मेजर जनरल रेजिनाल्ड सेवरी यांच्या स्वाक्षऱ्या होत्या.
advertisement
article_image_1
सैन्याच्या तुकड्यांचे विभाजन
भारतीय सैन्यातील सैनिकांना भारत किंवा पाकिस्तान यापैकी एक देश निवडण्याचा पर्याय देण्यात आला, पण त्यावर एक अट होती. एच. एम. पटेल यांच्या ‘राइट्स ऑफ पैसेज’ पुस्तकानुसार, पाकिस्तानमधील कोणताही मुस्लिम भारतीय सैन्यात आणि भारतातील कोणताही हिंदू किंवा इतर धर्मीय पाकिस्तानच्या सैन्यात भरती होऊ शकणार नाही.
ब्रिटीश नॅशनल आर्मी म्युझियमच्या अहवालानुसार, विभाजनानंतर दोन तृतीयांश सैनिक भारताकडे आणि एक तृतीयांश पाकिस्तानकडे गेले. भारताच्या वाट्याला 2,60,000 सैनिक आले, तर पाकिस्तानला 1,31,000 सैनिक मिळाले. यातील बहुतांश सैनिक मुस्लिम होते. नेपाळमधील गोरखा ब्रिगेडला भारत आणि ब्रिटनमध्ये वाटले गेले.
advertisement
वायुसेना आणि नौदलाचे विभाजन
ब्रिटीश भारतीय सैन्याच्या अंतर्गत वायुसेनेत 13 हजार सैनिक होते. यातील 10 हजार भारताला तर 3 हजार पाकिस्तानला मिळाले. नौदलात 8,700 सैनिक होते, त्यातील 5,700 भारताकडे आणि 3 हजार पाकिस्तानकडे वाटले गेले. काही ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतात राहून संक्रमण काळात मदत केली. भारताचे पहिले लष्करप्रमुख जनरल सर रॉबर्ट लॉकहार्ट आणि पाकिस्तानचे पहिले लष्करप्रमुख जनरल सर फ्रँक मेसेर्वी हे यामध्ये होते.
advertisement
स्वातंत्र्यानंतर ब्रिटीश रेजिमेंट्सची माघार
स्वातंत्र्यानंतर, ब्रिटीश सैन्याच्या रेजिमेंट्सना टप्प्याटप्प्याने भारतीय उपखंडातून परत बोलावण्यात आले. उत्तर-पश्चिम सीमेवरील आदिवासी भागातून नियोजनबद्ध आणि व्यवस्थित माघार घेतली गेली. 28 फेब्रुवारी 1948 रोजी पहिल्या बटालियन, समरसेट लाइट इन्फंट्री (प्रिन्स अल्बर्ट) ही शेवटची ब्रिटिश सैन्य तुकडी भारतातून बाहेर पडली. यामुळे ब्रिटनची जागतिक सैन्य क्षमता मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाली, कारण त्यांनी भारतीय सैन्याची शक्ती गमावली होती.
advertisement
article_image_1
स्वातंत्र्यानंतर भारतीय सैन्याची स्थिती
फाळणीपूर्वी भारतीय सैन्यात 36% मुसलमान होते, परंतु फाळणीनंतर हे प्रमाण केवळ 2% राहिले. केवळ 554 मुस्लिम अधिकाऱ्यांनी भारतात राहण्याचा निर्णय घेतला. ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान, ब्रिगेडियर मोहम्मद अनीस अहमद खान आणि लेफ्टनंट कर्नल इनायत हबीबुल्लाह यांसारख्या काही अधिकाऱ्यांनी भारताला आपले मातृभूमी मानले.
भारताच्या स्वातंत्र्यासाठीचा लढा आणि त्याच्या परिणामी झालेल्या फाळणीने इतिहासात एक अमूल्य ठसा उमटवला. लाखो लोक विस्थापित झाले, हजारो मृत्यूमुखी पडले, आणि नव्या स्वातंत्र्याची किंमत दोन्ही राष्ट्रांनी मोठ्या वेदनेने चुकवली.
view comments
मराठी बातम्या/Explainer/
स्वातंत्र्याच्या वेळी सैन्याची विभागणी कशी झाली? भारताला किती सैनिक मिळाले आणि किती पाकिस्तानात गेले?
Next Article
advertisement
CM Devendra Fadnavis On Thackeray Alliance:  ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी शाल...'
ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श
  • ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श

  • ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श

  • ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श

View All
advertisement