Dombivli News: डिसेंबरअखेर जलसंकट, डोंबिवलीत संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार, कधी?

Last Updated:

Dombivli News: डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. वर्षाअखेर पाणी जपून वापरावं लागणार असून संपूर्ण शहराचा पुरवठा खंडित राहणार आहे.

डिसेंबरअखेर पाणीटंचाईचं संकट, डोंबिवलीत संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार, कधी?
डिसेंबरअखेर पाणीटंचाईचं संकट, डोंबिवलीत संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार, कधी?
डोंबिवली: डोंबिवलीतील नागरिकांना डिसेंबरअखेर पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. येत्या मंगळवारी, 30 डिसेंबर रोजी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा 12 तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने हा निर्णय घेतला असून सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत पाणीपुरवठा खंडित राहणार आहे.
पालिका हद्दीतील खंबाळपाडा येथील जलकुंभाच्या अंतर्गत जलवाहिनीमध्ये गळती आढळून आली आहे. ही गळती रोखण्यासाठी तसेच भविष्यातील पाणीगळती टाळण्यासाठी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी जलवाहिनीतून पाणीपुरवठा तात्पुरता बंद ठेवणे आवश्यक असल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
advertisement
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका उल्हास नदीतून पाणी उचलते. मोहिली उदंचन केंद्रातून उल्हास नदीतील पाणी उचलून ते नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रात पाठवले जाते. येथे दररोज सुमारे 150 दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया केली जाते. शुद्धीकरणानंतर हे पाणी डोंबिवली पूर्व व पश्चिम भागासह कल्याण शहरालाही वितरित करण्यात येते.
या योजनेअंतर्गत खंबाळपाडा जलकुंभाची अंतर्गत जलवाहिनी पालिकेच्या मुख्य जलवाहिनीस जोडलेली आहे. याच ठिकाणी गळती झाल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत होता. त्यामुळे ही गळती तातडीने दुरुस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
advertisement
पालिकेने नागरिकांना पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने आवश्यक तेवढा पाणीसाठा करून ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच दुरुस्तीचे काम वेळेत पूर्ण करून रात्री 9 नंतर पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जाईल असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन पालिकेने केले आहे.
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Dombivli News: डिसेंबरअखेर जलसंकट, डोंबिवलीत संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार, कधी?
Next Article
advertisement
ZP Election Maharashtra: महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत जिल्हा परिषद निवडणुकीचा धुरळा, मतदान कधी? मोठी अपडेट...
महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत जिल्हा परिषद निवडणुकीचा धुरळा, मतदान कधी? मोठी
  • नगर परिषद, नगर पालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता महापालिका निवडणुकीची रणधुमाळी

  • दुसरीकडे जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचाही धुरळा लवकरच उडणार असल्याचे वृत्त समोर

  • महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा होणार अ

View All
advertisement