पाणी पिण्याचेही असतात नियम! 2.7 की 3 लिटर? उन्हाळ्यात तुमच्या शरीराला नक्की किती पाण्याची गरज आहे? वाचा सविस्तर
- Published by:Devika Shinde
Last Updated:
नक्की दिवसातून किती पाणी प्यावे? फक्त तहान लागल्यावरच पाणी पिणे पुरेसे आहे का? या प्रश्नांची उत्तरे देणारा एक विशेष कार्यक्रम नुकताच तपोवन रोड येथील समाजकल्याण केंद्रात पार पडला. यावेळी आरोग्यसल्लागार जितेंद्र नांदुरकर यांनी उन्हाळ्यातील जलसंजीवनीबद्दल अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनातील महत्त्वाचे मुद्दे सांगितले आहे.
मार्च महिना संपत आला की सूर्यनारायण आपला प्रकोप दाखवायला सुरुवात करतात. वाढत्या उन्हामुळे घामाच्या धारा वाहू लागतात आणि काही वेळातच आपल्याला थकवा जाणवू लागतो. या दिवसात आपण आरोग्याची कितीही काळजी घेतली, तरी एक गोष्ट सर्वात महत्त्वाची ठरते, ती म्हणजे हायड्रेशन. आपल्या शरीराचे इंजिन सुरळीत चालण्यासाठी पाण्याची भूमिका इंधनासारखी असते.
advertisement
पण, नक्की दिवसातून किती पाणी प्यावे? फक्त तहान लागल्यावरच पाणी पिणे पुरेसे आहे का? या प्रश्नांची उत्तरे देणारा एक विशेष कार्यक्रम नुकताच तपोवन रोड येथील समाजकल्याण केंद्रात पार पडला. यावेळी आरोग्यसल्लागार जितेंद्र नांदुरकर यांनी उन्हाळ्यातील जलसंजीवनीबद्दल अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनातील महत्त्वाचे मुद्दे तुमच्यासाठी खास येथे देत आहोत.
advertisement
तुमच्या वजनानुसार ठरवा पाण्याचे प्रमाणअनेकांना वाटते की दिवसातून 2-3 लिटर पाणी पिणे सर्वांसाठी सारखेच असते. मात्र, नांदुरकर यांनी एक सोपे गणित मांडले आहे. ते म्हणतात, "तुमच्या शरीराची पाण्याची गरज ही तुमच्या वजनावर अवलंबून असते. साधारणपणे दर 20 किलो वजनामागे 1 लिटर पाणी पिणे शरीरासाठी आवश्यक असते. म्हणजेच तुमचे वजन 60 किलो असेल, तर तुम्हाला किमान 3 लिटर पाण्याची गरज आहे."
advertisement
advertisement
advertisement
advertisement
काय प्यावे आणि काय टाळावे?फक्त साधे पाणीच नाही, तर आहारात इतर द्रवपदार्थांचा समावेश करणेही उन्हाळ्यात फायदेशीर ठरते.लिंबू पाणी, नारळ पाणी, ताक आणि लिंबू सरबत यांसारखी नैसर्गिक पेये शरीराला इलेक्ट्रोलाइट्स पुरवतात.अशावेळी चहा, कॉफी आणि अति साखरेची शीतपेये (Soft Drinks) कमी करा. ही पेये शरीरातील पाण्याचे प्रमाण उलट कमी करतात, त्यामुळे हे टाळावे.
advertisement
जास्त पाणी पिण्याचे 'मॅजिकल' फायदेकेवळ तहान भागवण्यासाठीच नाही, तर आरोग्याच्या इतर पैलूंसाठीही पाणी महत्त्वाचे आहे.मुबलक पाण्यामुळे त्वचा हायड्रेटेड राहते, ज्यामुळे उन्हाळ्यातील कोरडेपणा कमी होऊन चेहरा तजेलदार दिसतो.पाणी शरीरातील विषारी पदार्थ लघवीवाटे बाहेर टाकण्यास मदत करते, ज्यामुळे मूत्रपिंडाचे कार्य सुरळीत चालते.उन्हाळ्यात बद्धकोष्ठतेचा त्रास वाढतो. पुरेसे पाणी पचनक्रिया सुधारण्यास मदत करते.
advertisement










