advertisement

कुठे साचलं पाणी तर कुठे गारपीट, पावसाने पुण्याला झोडपलं! PHOTOS

Last Updated:
विजांच्या गडगडाटासह आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे काढणीला आलेल्या गहू, हरभरा आणि कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
1/5
महाराष्ट्रावर ऐन उन्हाळ्यात अस्मानी संकट आल्याचं पाहायला मिळत आहे. हवामान खात्याने बुधवारसाठी राज्यातील 24 जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा यलो अलर्ट दिला होता. त्यानुसार पुणे आणि कोल्हापूरमध्ये विजांच्या गडगडाटासह आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे काढणीला आलेल्या गहू, हरभरा आणि कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
महाराष्ट्रावर ऐन उन्हाळ्यात अस्मानी संकट आल्याचं पाहायला मिळत आहे. हवामान खात्याने बुधवारसाठी राज्यातील 24 जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा यलो अलर्ट दिला होता. त्यानुसार पुणे आणि कोल्हापूरमध्ये विजांच्या गडगडाटासह आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे काढणीला आलेल्या गहू, हरभरा आणि कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
advertisement
2/5
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि कोल्हापूरमध्ये एक तासभर जोरदार अवकाळी पावसाने बॅटिंग केली. यावेळी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने पुणे - सातारा महामार्गावर हरिश्चंद्री गावाच्या हद्दीत पाणी साचले. या अवकाळी पावसाने नागरिकांची मोठी तारांबळ उडालेली पाहायला मिळाली. महामार्गावर साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. तर कोल्हापूरमध्येगारांसह पावसाने जोरदार पावसाने हजेरी लावली.
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि कोल्हापूरमध्ये एक तासभर जोरदार अवकाळी पावसाने बॅटिंग केली. यावेळी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने पुणे - सातारा महामार्गावर हरिश्चंद्री गावाच्या हद्दीत पाणी साचले. या अवकाळी पावसाने नागरिकांची मोठी तारांबळ उडालेली पाहायला मिळाली. महामार्गावर साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. तर कोल्हापूरमध्ये गारांसह पावसाने जोरदार पावसाने हजेरी लावली.
advertisement
3/5
पुण्यातील बारामती तालुक्यातील बाबुर्डी आणि शेरेवाडी अचानक झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसासह पडलेल्या गारांनी शेती पिकांवर अक्षरशः तडाखा दिला असून, रब्बी हंगामातील पिके आडवी झाली आहेत.
पुण्यातील बारामती तालुक्यातील बाबुर्डी आणि शेरेवाडी अचानक झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसासह पडलेल्या गारांनी शेती पिकांवर अक्षरशः तडाखा दिला असून, रब्बी हंगामातील पिके आडवी झाली आहेत.
advertisement
4/5
मराठवाड्यातील, परभणी, हिंगोली आणि लातूरमध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. वादळी वाऱ्यासह गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. गहू, ज्वारी, हरभरा या रब्बी पिकांसोबतच आंबा, टोमॅटो आणि चिकू बागांनाही या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसला आहे. ऐन काढणीच्या तोंडावर आलेली पिके आडवी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
मराठवाड्यातील, परभणी, हिंगोली आणि लातूरमध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. वादळी वाऱ्यासह गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. गहू, ज्वारी, हरभरा या रब्बी पिकांसोबतच आंबा, टोमॅटो आणि चिकू बागांनाही या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसला आहे. ऐन काढणीच्या तोंडावर आलेली पिके आडवी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
advertisement
5/5
दरम्यान, राज्यात पुढील 2 दिवस पावसाचे असणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची योग्य ती काळजी घ्यावी.
दरम्यान, राज्यात पुढील 2 दिवस पावसाचे असणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची योग्य ती काळजी घ्यावी.
advertisement
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement