उन्हाळ्यात नाकातून रक्त येतंय? घोळणा फुटल्यावर करा हा उपाय, Video

Last Updated:

उन्हाळ्यात नाकातून रक्तस्त्राव होण्याची समस्या लहान मुलांमध्ये दिसते. तेव्हा योग्य ती काळजी घेणे गरजेचे असते.

+
उन्हाळ्यात

उन्हाळ्यात नाकातून रक्त येतंय? घोळणा फुटल्यावर करा हा उपाय, Video

लतिका तेजाळे, प्रतिनिधी
मुंबई: उन्हाळ्यात अचानक नाकातून भळाभळा रक्त वाहू लागले, अशा प्रकारचा अनुभव आपल्यापैकी अनेकांना आला असेल. नाकातून रक्त येणे म्हणजे नाकाचा घोळणा फुटणे होय. उन्हाळ्यात ही समस्या सहसा लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते. लहान मूल बाहेर उन्हात खेळतंय आणि अचानक त्याच्या नाकातून रक्त वाहू लागतं. म्हणजेच अधिक उष्णतेमुळे त्याचा घोळणा फुटतो. अशा परिस्थितीत घाबरून न जाता नेमकं काय करावं ? याबाबत मुंबईतील आहारतज्ज्ञ आरती भगत यांनी माहिती दिलीय.
advertisement
उन्हाळ्यात का फुटतो घोळणा?
उन्हाळ्यात उष्णतेमुळे घोळणा फुटण्याची समस्या अनेकांनी अनुभवली असेल. लहान मुलांमध्ये याचे प्रमाण अधिक असते. उष्णतेमुळे नाकातील पातळ त्वचा फाटली जाते. परिणामी नाकातून रक्त वाहायला सुरुवात होते. ही समस्या तात्पुरती असते. त्यामुळे या परिस्थितीत घाबरून जाण्याचे कारण नाही.
advertisement
डोक्यावर ओता थंड पाणी
घोळणा फुटला असेल तर सर्वप्रथम थंड पाणी डोक्यावर ओतावे. जेणेकरून रक्तस्त्राव त्वरित थांबण्यास मदत होते. पाणी ओतून किंवा थोडा वेळ नाकाची पुडी हाताने दाबून ठेवावी. तरी देखील रक्तस्त्राव थांबत नसेल तर जवळच्या डॉक्टरला लवकरात लवकर दाखवून घ्यावे.
advertisement
घोळणा फुटू नये म्हणून उपाय
उन्हाळ्यात आपल्या रोजच्या आहारात व्हिटॅमिन-सी असलेल्या पदार्थांचा जास्त समावेश केला पाहिजे. लहान मुलांना लिंबू सरबत, ऑरेंज, मोसंबी हे फळ जास्त प्रमाणात खायला द्यावीत. जेणे करून उन्हाळ्यात त्यांना उष्णतेचा कुठलाही त्रास होणार नाही. त्यासोबतच आहारात व्हिटॅमिन-के, पोटेशियम असलेल्या भाज्यांचा देखील समावेश करावा. कारण या पालेभाज्या खाल्याने लहान मुलांची आतली त्वचेची लेयर मजबूत बनते. त्यासोबतच नाकाची पातळ स्किन मजबूत ठेवण्यासाठी मूग, मटकी असे कडधान्य खावे. शेवटी उन्हाळ्यात भरपूर पाणी पिणे हा सर्व समस्यांवर एक रामबाण उपाय आहे, अशी माहिती आहारतज्ज्ञ आरती भगत यांनी दिली.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
उन्हाळ्यात नाकातून रक्त येतंय? घोळणा फुटल्यावर करा हा उपाय, Video
Next Article
advertisement
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच, सुधारणा म्हणजे लोकांचे ओझे कमी करणे : पंतप्रधान मोदी
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच : पंतप्रधान मोदी
  • पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकार सामान्य नागरिकांचे जीवन सोपे करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

  • कर कायदे, श्रम संहिता, जीएसटी सुधारणा आणि उद्योगांसाठी नियम सुलभ करून प्रक्रिया सुलभ झाली.

  • मध्यमवर्गीयांना कर सवलत, एमएसएमईना कर्ज व सवलती, ग्रामीण रोजगारात टिकाऊ मालमत्ता निर्माण होत आहे.

View All
advertisement