Mumbai- Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, दोन- तीन किमीपर्यंत रांगा; काही मिनिटांचं अंतर पार करण्यासाठी लागतोय तासभर

Last Updated:

Mumbai- Goa Highway Traffic: मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील लोटे, लवेल, आवाशी या भागात प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.

Mumbai- Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, दोन- तीन किमीपर्यंत रांगा; काही मिनिटांचं अंतर पार करण्यासाठी लागतोय तासभर
Mumbai- Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, दोन- तीन किमीपर्यंत रांगा; काही मिनिटांचं अंतर पार करण्यासाठी लागतोय तासभर
कोकणातील प्रमुख सणांपैकी एक सण असलेल्या गणेशोत्सवासाठी मुंबई पुण्याहून लाखो कोकणवासी कोकणात दाखल होत आहेत. गणेशोत्सवासाठी अवघे दोन दिवसच शिल्लक राहिले आहेत. २३ ऑगस्टपासून कोकणवासीयांची मुंबई- गोवा महामार्गावरून गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याची लगबग सुरू आहे. एकीकडे मुसळधार पाऊस तर दुसरीकडे खड्ड्यांची डोकेदुखी... यामुळे कोकणवासीय चांगलेच हैराण झाले आहेत. आता अशातच कोकणवासीयांचं आणखी एका कारणामुळे टेन्शन वाढलं आहे. ते म्हणजे, ट्रॅफिक. दरवेळी कोकणवासीयांना ट्रॅफिक आणि खड्ड्यांच्या त्रासाला सामोरं जावं लागतं. यावेळी सुद्घा कोकणवासीयांना ट्रॅफिकच्या त्रासाला तोंड द्यावं लागत आहे.
मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील लोटे, लवेल, आवाशी या भागात प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. ही वाहतूक कोंडी सोडवताना प्रशासनाची चांगली दमछाक झाली आहे, तर पुढील दोन ते तीन दिवस यापेक्षा अधिक रहदारी महामार्गावर होण्याची शक्यता बोलली जात आहे. मुंबई- गोवा महामार्गावर शनिवारी आणि रविवारी वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे. यामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. महामार्गावर दोन- तीन किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा असल्यामुळे प्रवाशांचा जीव अगदीच मेटाकुटीला आला आहे.
advertisement
बुधवारी (२७ ऑगस्ट) गणेश चतुर्थी आहे. गणेश चतुर्थीपर्यंत मुहूर्त गाठत गणरायाची प्राण प्रतिष्ठापना करण्यासाठी कोकणवासीय आपआपल्या गावाच्या दिशेनं रवाना झाले आहे. मुंबई गोवा महामार्गासोबतच इतर पर्यायी रस्त्यांवरही मोठ्या संख्येने वाहनांची वर्दळ सुरू आहे. त्यामुळं कोकणच्या दिशेनं जाणाऱ्या सर्व वाटांवर कमालीची गर्दी पाहायला मिळत आहे. मंगळवारपासूनच कोकणाच्या दिशेनं जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आणि शनिवार रात्रीपासून हा ओघ आणखी वाढला. या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचेही हाल होत असून ट्रॅफिक सुरळित करताना पोलिसांनाही मोठी कसरत करावी लागत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mumbai- Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, दोन- तीन किमीपर्यंत रांगा; काही मिनिटांचं अंतर पार करण्यासाठी लागतोय तासभर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement