कुटुंब विभक्त झाल्यानंतर स्वतंत्र रेशनकार्ड कसं काढायचे? नियम काय? A TO Z माहिती

Last Updated:

Ration Card : लग्नानंतर वेगळे राहणे, भावंडांमध्ये वाटणी होणे किंवा रोजगारानिमित्त वेगळा संसार थाटणे अशा अनेक कारणांमुळे एकाच रेशनकार्डवरील कुटुंब वेगवेगळे राहत असल्याची परिस्थिती निर्माण होते.

Ration card  News
Ration card News
मुंबई : घरातील कुटुंब विभक्त होणे ही आजकाल सामान्य बाब बनली आहे. लग्नानंतर वेगळे राहणे, भावंडांमध्ये वाटणी होणे किंवा रोजगारानिमित्त वेगळा संसार थाटणे अशा अनेक कारणांमुळे एकाच रेशनकार्डवरील कुटुंब वेगवेगळे राहत असल्याची परिस्थिती निर्माण होते. अशा वेळी स्वतंत्र रेशनकार्ड काढणे अत्यावश्यक ठरते. मात्र अनेक नागरिकांना या प्रक्रियेबाबत पुरेशी माहिती नसल्याने ते अडचणीत सापडतात. कुटुंब विभक्त झाल्यानंतर नवीन रेशनकार्ड कसे मिळवायचे, त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात आणि अर्ज प्रक्रिया काय आहे, याविषयी सविस्तर माहिती पुढे दिली आहे.
advertisement
कुटुंब विभक्त म्हणजे काय?
रेशनकार्डच्या दृष्टीने कुटुंब विभक्त झाल्याचा अर्थ असा होतो की कुटुंबातील एखादा सदस्य किंवा सदस्यांचे कुटुंब स्वतंत्र स्वयंपाक व्यवस्था ठेवून वेगळ्या घरात किंवा स्वतंत्र पत्त्यावर राहत आहे. अशा परिस्थितीत त्या व्यक्तीस किंवा कुटुंबास स्वतंत्र रेशनकार्ड मिळवण्याचा अधिकार आहे.
स्वतंत्र रेशनकार्डसाठी पात्रता
advertisement
कुटुंब विभक्त झाल्यानंतर स्वतंत्र रेशनकार्ड मिळवण्यासाठी संबंधित व्यक्ती महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक आहे. तसेच ती व्यक्ती आधीच्या रेशनकार्डवर नाव नोंदवलेली असावी किंवा कुटुंबप्रमुखाची संमती/पुरावा सादर करता येणे गरजेचे असते. स्वतंत्र घर, स्वतंत्र स्वयंपाक आणि वेगळा पत्ता ही बाब महत्त्वाची मानली जाते.
आवश्यक कागदपत्रे
advertisement
स्वतंत्र रेशनकार्डसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रांची आवश्यकता असते. जसे की,
आधारकार्ड (सर्व कुटुंबीयांचे)
जुन्या रेशनकार्डची प्रत
विभक्त झाल्याचा पुरावा (कुटुंब विभाजनाचा करारनामा, नोटरी केलेले प्रतिज्ञापत्र किंवा ग्रामपंचायत/महानगरपालिका प्रमाणपत्र)
रहिवासी पत्त्याचा पुरावा (वीज बिल, पाणी बिल, भाडेकरार)
advertisement
पासपोर्ट साइज फोटो
उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
शिधापत्रिका अर्ज नमुना
अर्ज करण्याची प्रक्रिया
स्वतंत्र रेशनकार्डसाठी अर्ज ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने करता येतो. राज्य सरकारच्या ‘महा-फूड’ किंवा अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करता येतो. अर्ज भरताना नवीन कुटुंबाची माहिती, पत्ता आणि जुन्या रेशनकार्डचा तपशील अचूक भरावा लागतो. ऑफलाइन पद्धतीत संबंधित तहसील कार्यालय, अन्नपुरवठा कार्यालय किंवा रेशनकार्ड सेवा केंद्रात अर्ज सादर करता येतो.
advertisement
तपासणी आणि मंजुरी
अर्ज सादर झाल्यानंतर पुरवठा विभागाकडून कागदपत्रांची पडताळणी केली जाते. काही प्रकरणांमध्ये प्रत्यक्ष पाहणीही केली जाऊ शकते. सर्व माहिती योग्य आढळल्यास स्वतंत्र रेशनकार्ड मंजूर करण्यात येते. साधारणतः 15 ते 30 दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होते.
नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना
खोटी माहिती देणे किंवा चुकीची कागदपत्रे सादर केल्यास अर्ज फेटाळला जाऊ शकतो. त्यामुळे अर्ज करताना सर्व माहिती अचूक देणे आवश्यक आहे. स्वतंत्र रेशनकार्ड मिळाल्यानंतर जुन्या कार्डमधून नाव वगळण्याची प्रक्रिया देखील पूर्ण करावी.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कुटुंब विभक्त झाल्यानंतर स्वतंत्र रेशनकार्ड कसं काढायचे? नियम काय? A TO Z माहिती
Next Article
advertisement
BMC Election Shiv Sena UBT : मध्यरात्री मोठी घडामोड, ठाकरेंच्या बड्या नेत्यानं घेतली शिंदेंची भेट, बालेकिल्ल्यातच धक्का बसणार?
मध्यरात्री मोठी घडामोड, ठाकरेंच्या बड्या नेत्यानं घेतली शिंदेंची भेट, बालेकिल्ल्
  • शिवसेना ठाकरे गटात अंतर्गत सुरू असलेल्या अस्वस्थतेच्या चर्चांना पुन्हा एकदा जोर

  • रात्री उशिरा घडलेल्या मोठ्या घडामोडींना ठाकरेंना मोठा बसणार असल्याची चर्चा

  • मध्यरात्री राजकीयदृष्ट्या मोठी घडामोड झाली.

View All
advertisement