advertisement

PM Narendra Modi : 'काँग्रेस आणि नकली शिवसेनेची लोक...', पंतप्रधान मोदींनी ठाकरेंना डिवचलं

Last Updated:

लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातून प्रचाराचा नारळ फोडला आहे. चंद्रपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे

'काँग्रेस आणि नकली शिवसेनेची लोक...', पंतप्रधान मोदींनी ठाकरेंना डिवचलं
'काँग्रेस आणि नकली शिवसेनेची लोक...', पंतप्रधान मोदींनी ठाकरेंना डिवचलं
चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातून प्रचाराचा नारळ फोडला आहे. चंद्रपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे, तसंच त्यांचा उल्लेख नकली शिवसेना असा केला आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बाळासाहेब ठाकरेंचं उदाहरणही दिलं.
'इंडिया आघाडीचे लोक दक्षिण भारताला वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहेत. सनातन धर्माला बनावट म्हणत आहेत, काँग्रेस आणि नकली शिवसेनेची लोक हे त्यांनाच महाराष्ट्रात बोलावून रॅली काढत आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणाले, मोदी दुसऱ्या राज्यात जातात आणि काँग्रेस आणि आर्टिकल 370 बद्दल का बोलतात. मला सांगा काश्मीर आपलं आहे की नाही? जेव्हा काश्मिरी लोकांची घरं जाळली जात होती, त्यावेळी बाळासाहेब ठाकरे समोर आले आणि त्यांनी काँग्रेसचा विरोध केला होता. त्यावेळी बाळासाहेबांनी काश्मीरमध्ये काय घडलं म्हणून महाराष्ट्राचा काय संबंध असा विचार केला नाही. आज एकनाथ शिंदे हे त्यांच्या विचाराचा पक्ष चालवत आहे, याचा मला आनंद आहे', असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
advertisement
advertisement
दहशतवादाला काँग्रेसने पोसलं
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर विभाजन कुणी केलं? देश स्वतंत्र झाल्यानंतर काश्मीरमध्ये अडचणी काँग्रेसने उभ्या केल्या. आपल्या आजूबाजूला अनेक देश प्रगती करत आहेत, पण देश कुणामुळे अडचणीत आहे? देश कित्येक वर्ष दहशतवादाने ग्रासलेला होता. दहशतवाद्यांना कोण संरक्षण कोण देत होतं? काँग्रेस देत होती. माओवाद्याची लाल दहशत काँग्रेसमुळे वाढली. राम मंदिर निर्माणाचा विषय अनेक वर्षांपासून रखडलेला होता. राम मंदिराच्या कामात कोण अडथळा आणत होतं. राम मंदिराच्या कामाला विरोध करण्यासाठी कोर्टात जात होते. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर कुणी विरोध केला, बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न कुणी दिला नाही., या सगळ्या अडचणीचं एकच उत्तर आहे काँग्रेस, अशी टीका पंतप्रधानांनी केली.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
PM Narendra Modi : 'काँग्रेस आणि नकली शिवसेनेची लोक...', पंतप्रधान मोदींनी ठाकरेंना डिवचलं
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement