पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे गावात महादेवाच्या मंदिरात पूजेसाठी गेलेले तीन साधू गावात पूर आल्याने मंदिरात अडकलेले आहेत, त्यांना बाहेर काढण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची टीम गुरसाळे गावात पोहचत आहे.
मुंबईला पावसानं झोडपून काढलंय.पहाटेपासूनच मुंबईच्या विविध भागात मुसळधार पावसानं हजेरी लावली. अनेक महत्वाच्या ठिकाणी पाणी साचलं असून रस्ते जलमय झाले आहेत. संपूर्ण मुंबईत ढगाळ वातावरणामुळे काळोख पसरला आहे. जेजे फ्लायवर, दादर, अंधेरी, सायन किंग्स सर्कल, महालक्ष्मी अशा विविध परिसरात पाणी साचलंय.अंबरनाथ – बदलापूर या भागातही विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नागरिकांचे चांगलेच हाल होत आहेत…सार्वजनिक वाहतूक सेवेसह रेल्वे वाहतूकीचा खोळंबा झालाय..त्यामुळे सकाळीच चाकरमान्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना देण्यात आलीय..
कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने पनवेल शहराला चांगलाच झोडपून काढलं. पनवेल आणि कळंबोली भागात पाणी साचल होतं तर सखल भागातील घरांमध्ये पाणी साचलंय. यामुळे पनवेलकरांची तारांबळ उडालीय. मातीच्या भरावामुळे पनवेल कळंबोली भागात पाणी वाढत असल्याने महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी अधिकची यंत्रणा लावण्यात आल्याच सांगितलंय.
मुंबईसह ठाणे, उपनगर आणि नवी मुंबईत पहाटेपासून विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. ऐरोली मुलुंड ब्रिज वर वाहणांच्या लांबच लांब रांगा. पहिल्याच पावसात रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे.
सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुक्यामध्ये अवकाळी मुसळधार पावसात अनेक ठिकाणी शेतामध्ये पाणी साठल्याने चिखल तयार झाला आहे. नांदगिरी खेड येथील सचिन चतुर यांच्या शेतामध्ये आले (अद्रक) काढणी सुरू असताना पावसामुळे शेतामध्ये चिखल झाल्यामुळे आल्याची पोती बाहेर काढताना शेतकऱ्यांचे पाय गुडघाभर रोवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मोठी कसरत करत यातून शेतकरी डोक्यावर पोती घेऊन मार्ग काढताना पाहायला मिळत आहेत. सध्या याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
कोकणातील धबधबे साधारणतः जून महिन्याच्या शेवटी किंवा जुलै महिन्यात प्रवाहीत होताना परंतु यावर्षी मान्सूनपूर्व पाऊस जोरदार बारसल्याने मे महिन्यातच धबधबे प्रवाहित झाल्याचे चित्र सध्या रत्नागिरीत पाहायला मिळत आहे. सध्या रत्नागिरीतील पानवलचा धबधबा प्रवाहित झाला असून त्याचे सुंदर रूप अनुभवयास मिळत आहे.
पर्यटन नगरीत चोवीस तासांत पावसाने तुफान बॅटिंग केली असून या पावसाने कहर केलाय, लोणावळ्यातील जनजीवन विस्कळीत 24 तासांत 233 मि.मी. (9.17 इंच) पावसाची नोंद झाली आहे. यंदा मान्सूनपूर्व पाऊस मे महिन्यातच दाखल झाल्याने प्रशासनाची तयारी अपुरी ठरली आहे. कैवल्यधाम परिसरातील बद्रीविशाल सोसायटीसह जुना खंडाळा भागात काही घरांमध्ये पाणी शिरले असून नागरिकांचे संसार रस्त्यावर आलेत. वेळेवर नाले सफाई न केल्याने त्याचा परिणाम पावसाळ्यात दिसून आला. त्याचा फटका करदात्यांना सोसावा लागलाय आणि मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे…
बारामतीत निरा डावा कालवा फुटल्याने शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पहाटेपासुनच पाहणी दौरा सुरु केला. आज दिवसभर अजित पवार बारामतीत पाहणी करणार आहे. पावसामुळे पिकं जमीनदोस्त झाली असून घरांचीही पडझड झाली आहे. बारामती एमआयडीसीतही इमारतीचं मोठं नुकसान झालं आहे.
बदलापूर शहरात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात झालीय. या पावसामुळे मच्छी मार्केट भागातील पूर्वेतून पश्चिमेला जाणाऱ्या मार्गात पाणी भरल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झालाय. त्यामुळे या मार्गाचा वापर वाहन चालकांनी आणि बदलापूरकरांनी करू नये अन्यथा दुर्घटना होण्याची शक्यता आहे .पहाटे एक ते दीड तास विश्रांती घेतलेला पाऊस आता पुन्हा एकदा मेघगर्जनेसह बरसायला सुरुवात झालीय. त्यामुळे नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावं अशा सूचना प्रशासनाकडून केला जात आहेत.
मुंबईला मुसळधार पावसानं झोडपलंय. या पावसानं शहराच्या अनेक भागात पाणी साचलंय. किंग्ज सर्कल भागातही पाणी साचलंय. मुंबईसह उपनगरात सखोल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. पहाटेपासून मुंबईसह उपनगरात पाऊस सुरू झाला आहे.
कोल्हापुरात गांधी मैदानाचे झाले तळे
पाणी जाण्यासाठी उपाय न केल्याने गांधी मैदान पाण्यात
मैदानासाठी खर्च केलेले पाच कोटीही पाण्यात
शहराच्या मध्यभागी असलेल्या मैदानाचे तलावात रूपांतर
मैदानात साधले पाच ते सहा फूट पाणी