हातातून 'या' वस्तू पडणं मानलं जात खूपच अशुभ, नेमकं काय घडत?
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
अनेकदा घाईघाईत किंवा नकळत आपल्या हातातून काही वस्तू जमिनीवर पडतात. आपण याला सामान्य घटना मानून दुर्लक्ष करतो, परंतु शकुन शास्त्रानुसार हातातून ठराविक वस्तू वारंवार पडणे हे येणाऱ्या संकटाचे किंवा आर्थिक नुकसानीचे लक्षण असू शकते.
शकुन शास्त्रानुसार आपल्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या लहान-मोठ्या घटना भविष्यातील शुभ-अशुभ संकेतांची माहिती देत असतात. अनेकदा घाईघाईत किंवा नकळत आपल्या हातातून काही वस्तू जमिनीवर पडतात. आपण याला सामान्य घटना मानून दुर्लक्ष करतो, परंतु शकुन शास्त्रानुसार हातातून ठराविक वस्तू वारंवार पडणे हे येणाऱ्या संकटाचे किंवा आर्थिक नुकसानीचे लक्षण असू शकते.
advertisement
मीठ पडणे: हातातून मीठ सांडणे हे सर्वात मोठे अशुभ लक्षण मानले जाते. शकुन शास्त्रानुसार, मीठ सांडणे हे कुंडलीतील शुक्र आणि चंद्राच्या कमकुवत स्थितीचे लक्षण आहे. यामुळे घरात दरिद्रता येते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये विनाकारण वादविवाद सुरू होतात. पाश्चात्य संस्कृतीतही मीठ सांडणे हे दुर्दैवाचे लक्षण मानले जाते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
काच फुटणे किंवा पडणे: हातातून काचेच्या वस्तू पडणे आणि त्या फुटणे हे देखील अशुभ मानले जाते. जरी काही लोक म्हणतात की संकट टळले, तरी शकुन शास्त्रानुसार काच फुटणे हे घरात नकारात्मक ऊर्जा वाढण्याचे आणि नात्यांमध्ये दुरावा येण्याचे लक्षण आहे. यामुळे मानसिक अस्वस्थता वाढू शकते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)









