इथे प्राण्यांना नवरी सारखी सजवतात आणि... शेतकऱ्यांची आगळीवेळी 'सगर' परंपरा आहे तरी काय?
- Reported by:Kale Narayan
- Published by:Devika Shinde
Last Updated:
जालना शहरात दरवर्षी दिवाळीत साजरी होणारी सगर परंपरा ही हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे. या दिवशी पशुपालक आपल्या जनावरांना सजवून मिया साहेब दर्ग्यात दर्शनासाठी नेतात.
नारायण काळे-प्रतिनिधी, जालना : आपल्या देशात विविध प्रथा-परंपरा आजही उत्साहात साजऱ्या केल्या जातात. जालना शहरातील अशाच एका शतकानुशतकांपासून सुरू असलेल्या परंपरेमध्ये "सगर" परंपरेला विशेष स्थान आहे. दरवर्षी दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी, शहरातील पशुपालक आपली जनावरे नवरीसारखी सजवतात आणि त्यांना मिया साहेब दर्गा येथे घेऊन जातात. ही परंपरा जनावरांना रोग-राईपासून संरक्षण मिळावे याकरिता कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुरू झाली आहे.
प्राचीन काळात एका अज्ञात रोगाने जनावरांवर मोठा कहर केला होता. या संकटातून सुटका व्हावी, म्हणून हिंदू-मुस्लिम पशुपालकांनी मिया साहेब दर्ग्याला प्रार्थना केली. त्या वेळी या रोगाचा प्रकोप हळूहळू कमी झाला, त्यामुळे दरवर्षी मियासाहेब दर्ग्यात कृतज्ञतेने पशू मिरवणूक काढण्याची परंपरा सुरू करण्यात आली, असे स्थानिक जाणकार सांगतात.
advertisement
सगर परंपरेचे साजरेपण
या दिवशी, शहरातील गवळी, शेतकरी आणि पशुपालक आपल्या पशूंना सजवून, सादर करतात. दर्ग्याजवळ आणि शहरात ठिकठिकाणी पशू प्रदर्शन आयोजित केले जाते, जिथे सजवलेल्या जनावरांची स्पर्धा होते. यात सर्वोत्कृष्ट सजवलेल्या जनावरांना इनाम दिले जाते, यामुळे पशुपालकांचे समाधान आणि उत्साह द्विगुणित होतो.
advertisement
हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक
view commentsसगर परंपरेत हिंदू आणि मुस्लिम समाज एकत्र येऊन या उत्सवात सहभागी होतात. मुस्लिम समाज हिंदू पशुपालकांचा आदर सत्कार करतो, तसेच पान-सुपारी देऊन त्यांचा सन्मान करतो. जालना शहरातील मिया साहेब दर्ग्यासह विविध ठिकाणी सगर साजरा करण्यात येतो. सगर ही केवळ एक परंपरा नसून, सामाजिक ऐक्याचे प्रतीक म्हणून ही परंपरा महत्त्वाची ठरते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Nov 04, 2024 5:35 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
इथे प्राण्यांना नवरी सारखी सजवतात आणि... शेतकऱ्यांची आगळीवेळी 'सगर' परंपरा आहे तरी काय?









