advertisement

गावातील वाया जाणाऱ्या पाण्याचा असाही उपयोग, माऊली यांचा 'हराळवाडी पॅटर्न' चर्चेत, नेमकं काय केलं?

Last Updated:

सार्वजनिक नळांमधून वाया जाणाऱ्या पाण्याचा योग्य वापर करून पर्यावरण संवर्धनाचा अनोखा हराळवाडी पॅटर्न उभा केला आहे. त्यामुळे त्यांची सर्वत्र चर्चा होत आहे.

+
News18

News18

सोलापूर : पाणी हेच जीवन या उक्तीचा प्रत्यय देणारा आदर्श उपक्रम सोलापुरातील हराळवाडी गावात राबविण्यात आला आहे. गावातील जागरूक ग्रामस्थ माऊली हेगडे यांनी ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक नळांमधून वाया जाणाऱ्या पाण्याचा योग्य वापर करून पर्यावरण संवर्धनाचा अनोखा हराळवाडी पॅटर्न उभा केला आहे. त्यामुळे त्यांची सर्वत्र चर्चा होत आहे.
ग्रामपंचायतीच्या आवारात आणि मोकळ्या जागेत साचणारे पाणी पाहून त्यांनी पुढाकार घेतला. या पाण्याचा अपव्यय थांबवून त्यावर तब्बल 35 ते 40 फळझाडांची लागवड करण्यात आली. केळी, सफरचंद, आंबा, चिकू आणि पपई यांसारखी विविध फळझाडे त्यांनी लावली असून कोणत्याही रासायनिक खतांचा वापर न करता नैसर्गिक पद्धतीने ती जोपासली आहेत. आज ही झाडे फुलून आली असून गावकऱ्यांना ताजी, सेंद्रिय फळे उपलब्ध होत आहेत.
advertisement
53 फळझाडांची लागवड
यापूर्वीही त्यांनी जिल्हा परिषद शाळेत सुमारे 53 फळझाडांची लागवड केली होती. आज ती झाडे मोठी झाली असून शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक मधल्या सुट्टीत त्यांची फळे खातात. वाया जाणारे पाणी थांबल्याने परिसरात डासांची उत्पत्ती कमी झाली असून रोगराईवरही आळा बसला आहे. पर्यावरण रक्षणासोबतच आरोग्य आणि सामाजिक जाणीव वाढवणारा हा उपक्रम सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. हराळवाडी पॅटर्न इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
view comments
मराठी बातम्या/सोलापूर/
गावातील वाया जाणाऱ्या पाण्याचा असाही उपयोग, माऊली यांचा 'हराळवाडी पॅटर्न' चर्चेत, नेमकं काय केलं?
Next Article
advertisement
IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement