पुढचे ४८ तास अत्यंत धोक्याचे! अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, महाराष्ट्रातील हवामानही बदलणार

Last Updated:

महाराष्ट्रात अमित कुमार यांच्या मते ऑक्टोबर हिटमुळे उष्णता वाढली असून कोकण वगळता पावसाचा अंदाज आहे. दिवाळीत पावसाचं विघ्न आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

News18
News18
मुंबई: कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात ऑक्टोबर हिटचे चटके बसले आहेत. तळकोकणात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. 24 तासांत ब्रह्मपुरी इथे सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. उकाड्यामुळे घामाच्या धारा लागल्या आहेत. लोक हैराण झाली आहेत. मान्सूननं महाराष्ट्रातून निरोप घेतला असला तरी दिवाळीला पावसाचा धोका कायम आहे. दक्षिणेकडे तयार झालेल्या सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे ही स्थिती निर्माण झाली आहे.
7 दिवस पावसाचे
ऐन दिवाळीत पावसाचं विघ्न असणार आहे. इतकंच नाही तर अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. त्यामुळे दक्षिणेकडील राज्यात 7 दिवस मुसळधार पाऊस राहणार आहे. दक्षिणे पूर्ण अरबी सागरात सायक्लोनिक सर्क्युलेशन अजूनही आहे. अरबी समुद्रापासून मध्यावर हे असल्यामुळे त्याचा दबावामुळे कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. आज कमी दाबाचा पट्टा तयार होईल. त्यामुळे वादळाचा धोका दक्षिणेकडील राज्यांना आहे. महाराष्ट्राला जरी थेट धोका नसला तरीसुद्धा हवामानात वेगाने बदल दिसून येण्याची शक्यता आहे.
advertisement
48 तासात येणार वादळ
हवामान तज्ज्ञ अमित कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या 48 तास महत्त्वाचे आहेत. त्यानंतर पुढच्या 48 तासांत कमी दबावाचे क्षेत्र तयार होणार असून ते लक्ष्यद्विपकडून पश्चिम बंगालच्या दिशेनं पुढे सरकेल. पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आज वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 19 ऑक्टोबर रोजी देखील कोकण, मध्य महाराष्ट्रात पाऊस राहणार आहे. तिथे हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.
advertisement
महाराष्ट्रात काय असेल स्थिती?
हवामान तज्ज्ञ अमित कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 आणि 21 ऑक्टोबर रोजी देखील मराठवाड्याचा काही भाग वगळता संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दक्षिणेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात पाऊस राहणार आहे. अति उष्णता आणि पाऊस असं दुहेरी संकट राहणार आहे. 22 आणि 23 ऑक्टोबर रोजी पाऊस होईल. त्यानंतर उकाडा वाढेल. ऑक्टोबर हिटच्या झळा बसणार आहेत. अति उष्णतेमुळे लोक हैराण झाले आहेत. पाऊस पडून गेल्यावर जास्त गरम होत आहे. मात्र 23 ऑक्टोबरनंतर पाऊस राहणार नाही तर थंडीची चाहूल कधी लागणार याची प्रतिक्षा आहे. यंदा ला निनामुळे थंडी जास्त असेल असा अंदाज आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पुढचे ४८ तास अत्यंत धोक्याचे! अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, महाराष्ट्रातील हवामानही बदलणार
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement