advertisement

Property Rules : आईच्या मृत्यूनंतर आजोबांच्या संपत्तीत नातवंडांचा वाटा असतो का? काय सांगतो 'हिंदू वारसा कायदा'

Last Updated:

Property Rights : अनेकांना असे वाटते की आईच्या मृत्यूनंतर तिचा वडिलांच्या (आजोबांच्या) संपत्तीवरील हक्क संपतो. पण कायद्याची पाने काही वेगळेच सांगतात.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : आपल्या समाजात मालमत्ता किंवा संपत्ती हा विषय जितका जिव्हाळ्याचा आहे, तितकाच तो वादाचाही ठरतो. जेव्हा वडिलांच्या किंवा आजोबांच्या संपत्तीचा प्रश्न येतो, तेव्हा नात्यांमधील गुंतागुंत वाढू लागते. अनेकदा कुटुंबात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू वसीयत (Will) न करताच होतो, आणि मग सुरू होतो वारसा हक्काचा संघर्ष.
अनेकांना असे वाटते की आईच्या मृत्यूनंतर तिचा वडिलांच्या (आजोबांच्या) संपत्तीवरील हक्क संपतो. पण कायद्याची पाने काही वेगळेच सांगतात. आज आपण 'हिंदू उत्तराधिकार अधिनियम, 1956' नुसार, आईच्या मृत्यूनंतर तिच्या मुलांचा (नातवंडांचा) आजोबांच्या संपत्तीवर नक्की काय अधिकार असतो, हे सोप्या भाषेत समजून घेणार आहोत.
हिंदू वारसा कायद्यानुसार, जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू वसीयत न करता झाला, तर त्याची संपत्ती त्याचे कायदेशीर वारसदार म्हणजेच पत्नी, मुलगा आणि मुलगी यांच्यात समान प्रमाणात विभागली जाते. हे तिघेही 'प्रथम श्रेणी' (Class 1) वारसदार मानले जातात.
advertisement
एका उदाहरणाने समजून घेऊया
समजा, एका व्यक्तीचा 1977 मध्ये मृत्यू झाला आणि त्याने कोणतीही वसीयत केली नव्हती. त्याच्या पश्चात त्याची पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी आहे. कायद्यानुसार, या तिघांनाही संपत्तीचा प्रत्येकी 1/3 (एक-तृतीयांश) हिस्सा मिळेल.
आईच्या मृत्यूनंतर नातवंडांचे काय होते?
आता मुख्य प्रश्न असा की, जर त्या मुलीचा (आईचा) मृत्यू झाला, तर तिच्या हक्काच्या वाट्याचे काय होईल?
advertisement
कायद्यानुसार, आईचा मृत्यू झाला तरी तिचा त्या संपत्तीवरील 1/3 हिस्सा रद्द होत नाही. आईच्या मृत्यूनंतर तिची जागा तिचे कायदेशीर वारसदार, म्हणजेच तिचे पती आणि मुले घेतात. आजोबांच्या संपत्तीतील जो हिस्सा आईला मिळणार होता, त्यावर आता तिच्या मुलांचा पूर्ण अधिकार असतो.
दानपत्र (Gift Deed) आणि कायदेशीर पेच
बऱ्याचदा असं घडतं की, कुटुंबातील एखादी व्यक्ती (उदा. मृत व्यक्तीची पत्नी) भावनेच्या भरात किंवा अज्ञानापोटी संपूर्ण संपत्ती मुलाच्या नावे 'दानपत्र' करून देते. पण इथे एक मोठा कायदेशीर अडथळा आहे.
advertisement
कोणतीही व्यक्ती केवळ स्वतःच्या हक्काचा हिस्साच दुसऱ्याला दान करू शकते. जर आईने आपल्या वाट्याचा 1/3 हिस्सा मुलाला दिला असेल, तर ते वैध आहे. परंतु, जर तिने मृत मुलीचा (बहिणीचा) वाटाही मुलाच्या नावावर केला असेल, तर ते कायदेशीररित्या चुकीचे आहे. मुलीच्या हिश्शावर केवळ तिच्या मुलांचा आणि पतीचाच अधिकार राहतो.
अनेकांचा असा युक्तिवाद असतो की ही 'वडीलार्जित' किंवा 'पैतृक' संपत्ती आहे, त्यामुळे मुलीला हक्क नाही. पण 1956 च्या कायद्यानंतर नियम बदलले आहेत:
advertisement
1. 1956 च्या कायद्यानंतर वडिलांकडून मिळालेली संपत्ती ही वारसदाराची वैयक्तिक मालमत्ता मानली जाते.
2. वैयक्तिक मालमत्तेत मुलगा आणि मुलगी दोघांनाही जन्मतः समान हक्क प्राप्त होतात. त्यामुळे 'पैतृक' संपत्ती असल्याचे सांगून मुलीचा किंवा तिच्या मुलांचा हक्क डावलता येत नाही.
केवळ सातबारावर किंवा कागदपत्रावर दुसऱ्याचे नाव लागले म्हणजे तुमचा हक्क संपला असे होत नाही. आईच्या वाट्याची संपत्ती मिळवणे हा नातवंडांचा कायदेशीर अधिकार आहे. जर तुमच्या कुटुंबातही असा मालमत्तेचा वाद असेल, तर कायद्याची मदत घेऊन तुम्ही तुमचा योग्य वाटा मागू शकता.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Property Rules : आईच्या मृत्यूनंतर आजोबांच्या संपत्तीत नातवंडांचा वाटा असतो का? काय सांगतो 'हिंदू वारसा कायदा'
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement