'आता फार काळ राहिला नाही लवकरच भारत बनेल जागतिक मनोरंजनचं केंद्र': मुकेश अंबानी

Last Updated:

भारताची तिसरी सर्वात मोठी ताकद तंत्रज्ञान आहे. भारतातील १.२ अब्ज मोबाईल फोन वापरकर्ते म्हणजे १.२ अब्ज स्क्रीन, ज्या मनोरंजनासाठी वापरता..

News18
News18
मुंबई: 'भारताला मीडिया आणि मनोरंजन उद्योगाचे जागतिक केंद्र होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. त्याच्या आशयासह, लोकसंख्या आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत, भारत लवकरच या उद्योगावर राज्य करेल' असा विश्वास रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी व्यक्त केला. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट (वेव्हज) २०२५ मध्ये मुकेश अंबानी बोलत होते.
मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल ॲण्ड एन्टरटेन्मेंट समिट – २०२५ कार्यक्रमाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमात मुकेश अंबानी यांनी भाषण केलं होतं.
"एआय आता मनोरंजनासाठी ते करत आहे जे १०० वर्षांपूर्वी सायलेंट कॅमेरा करत होता आणि तेही लाखो पटीने चांगलं. जगातील १.४ अब्ज लोकसंख्या असलेला हा देश गेल्या ५ हजार वर्षांपासून गोष्टी सांगत आणि ऐकत आहे. कंटेंट आणि लोकसंख्येनंतर, भारताची तिसरी सर्वात मोठी ताकद तंत्रज्ञान आहे. भारतातील १.२ अब्ज मोबाईल फोन वापरकर्ते म्हणजे १.२ अब्ज स्क्रीन, ज्या मनोरंजनासाठी वापरता येतात. जिओने हाय-स्पीड इंटरनेट डेटा परवडणारा बनवून भारताच्या डिजिटल आणि मनोरंजन क्रांतीत आघाडीचे योगदान दिले आहे. ५ जी वर बांधलेली आमची जागतिक दर्जाची डिजिटल पायाभूत सुविधा लवकरच ६ जी पर्यंत वाढवली जाईल." असं यावेळी मुकेश अंबानी म्हणाले.
advertisement
"जागतिक मनोरंजन क्षेत्रातील दिग्गजांना स्पर्धा करून त्यांना मागे टाकण्याच्या महत्त्वाकांक्षेने आम्ही JioHot लाँच केलं आहे. हे भारत आणि परदेशातील सर्वोत्तम प्रतिभांना एक व्यासपीठ प्रदान करेल. आम्ही सर्वाधिक पाहण्याचे रेकॉर्ड तोडले आहेत, आयपी स्ट्रीमिंगमध्ये क्रांती घडवली आहे आणि इमर्सिव्ह, बहुभाषिक, क्रीडा सामने दाखवण्यात जागतिक मानक बदलले आहेत. आणि ही फक्त सुरुवात आहे. डिस्नेसोबत जिओची भागीदारी डिजिटल स्टोरीटेलिंगमध्ये एका नवीन युगाची सुरुवात आहे." असंही यावेळी मुकेश अंबानी म्हणाले.
view comments
मराठी बातम्या/मनी/
'आता फार काळ राहिला नाही लवकरच भारत बनेल जागतिक मनोरंजनचं केंद्र': मुकेश अंबानी
Next Article
advertisement
Mumbai Mayor Reservation: अ, आ, इ, ई... आणि मुंबईचा गेम झाला! महापौर पदाच्या शर्यतीतून ओबीसी प्रवर्ग बाहेर पडण्याचं खरं कारण
अ, आ, इ, ई... अन् मुंबईचा गेम झाला! महापौर पदाच्या शर्यतीतून ओबीसी बाहेर का?
  • मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

  • महापौर आरक्षण सोडतीवर शिवसेना ठाकरे गटाने आक्षेप घेतला होता.

  • ओबीसींसाठी मुंबईचं महापौर पदाचं आरक्षण का लागू झालं नाही, असा प्रश्न उपस्थित करण

View All
advertisement