EPFO कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! फ्री लाइफ इन्शुरन्स संदर्भात घेतला महत्त्वाचा निर्णय
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
EPFO Free Insurance: ईडीएलआय योजनेची सुरुवात 1976 मध्ये झाली. या योजनेचा कर्मचाऱ्यांना खूप फायदा होतो. याच योजनेसंदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत.
नवी दिल्ली : एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनने एम्प्लॉईज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स म्हणजेच EDLI योजनेचा कालावधी तीन वर्षांनी वाढवला आहे. EPFO च्या सुमारे 6 कोटी सदस्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. EDLI योजनेअंतर्गत, EPFO सदस्यांना 7 लाख रुपयांपर्यंतचा मोफत जीवन विमा मिळतो. यापूर्वी 28 एप्रिल 2021 रोजी EDLI योजनेसाठी अधिकृत अधिसूचना जारी करून, EPFO सदस्यांच्या वारसांना उपलब्ध विमा लाभ तीन वर्षांसाठी वाढवण्यात आला होता. आता त्यात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. EPFO ने 7 लाख रुपयांपर्यंतच्या विम्याचे लाभ घेण्यासाठी नियम शिथिल केले आहेत. विम्याचा लाभ घेण्यासाठी आधी कर्मचाऱ्याला एकाच ठिकाणी 12 महिने काम करणे आवश्यक होते, आता ही अट काढून टाकण्यात आली आहे.
EDLI योजना 1976 मध्ये सुरू झाली. ज्याचा उद्देश कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्यांना विम्याचा लाभ मिळवून देणे हा आहे. जेणेकरून जेव्हा जेव्हा EPFO सदस्याचा मृत्यू होतो तेव्हा कुटुंबाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. विम्याची रक्कम ईपीएफ खातेधारकाच्या नॉमिनीला दिली जाते. जर कोणाला नॉमिनी केले गेले नसेल, तर त्याच्या कायदेशीर वारसांना विम्याची रक्कम तितकीच मिळते. कर्मचाऱ्याचा आजार, अपघात किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास विमा संरक्षण दिले जाऊ शकते.
advertisement
विम्याची रक्कम पगारावर अवलंबून असते
EDLI योजनेंतर्गत मिळणारी विमा रक्कम मागील 12 महिन्यांच्या पगारावर अवलंबून असते. एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास, नामनिर्देशित व्यक्तीला 20 टक्के बोनससह मागील 12 महिन्यांच्या सरासरी पगाराच्या 30 पट मिळते. कर्मचाऱ्यांच्या पगारातून दरमहा जमा होणाऱ्या पीएफच्या रकमेपैकी 8.33 टक्के रक्कम ईपीएसमध्ये, 3.67 टक्के ईपीएफमध्ये आणि 0.5 टक्के रक्कम ईडीएलआय योजनेत जमा केली जाते.
advertisement
तुम्ही तुमची नोकरी सोडल्यास तुम्हाला लाभ मिळणार नाहीत
EDLI योजनेअंतर्गत कोणताही खातेदार किमान 2.5 लाख रुपये आणि कमाल 7 लाखांचा इन्शुरन्स क्लेम मिळवू शकतो. किमान क्लेम मिळविण्यासाठी, खातेदाराने सतत किमान 12 महिने नोकरी केली असावी. नोकरी सोडणाऱ्या खातेदाराला विम्याचा लाभ दिला जात नाही.
पीएफ खात्यावरील या विम्याचा दावा तेव्हाच केला जाऊ शकतो जेव्हा पीएफ खातेधारकाचा सेवेत असताना मृत्यू होतो, म्हणजे निवृत्तीपूर्वी. या काळात तो कार्यालयात काम करत असो वा रजेवर असो. काही फरक पडत नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 22, 2024 1:32 PM IST