advertisement

Mumbai News: पावसाळ्याआधी मुंबई ॲक्शन मोडवर, पाणी उपसा पंपाचा आकडा वाढला

Last Updated:

मुंबई महापालिकेने यावर्षी लागणाऱ्या पाणी उपसण्याच्या पंपामध्ये वाढ केली आहे. त्यामुळे यंदा पाणी साचण्याचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.

News18
News18
मुंबई: दरवर्षी मुंबई शहर पावसामुळे तुंबते. शहरामध्ये पावसाळ्यातील तुंबलेले पाणी उपसण्यासाठी आत्ताच बीएमसीकडून उपाययोजना सुरू झालेल्या आहेत. दरवर्षी पावसाळ्यामध्ये मुंबईतील अनेक खोलगट भागांमध्ये पाणी साचते. त्यामुळे मुंबईकरांचे मोठ्या प्रमाणावर हाल होतात. पावसाळ्यात शहरामध्ये तुंबलेले पाणी उपसण्यासाठी 547 पंप बसवण्यात येणार असल्याची माहिती बीएमसीच्या पर्जन्यजल विभागाने दिली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाच्या पाणी उपसण्याच्या पंपामध्ये वाढ केली आहे. त्यामुळे यावर्षी मुंबईमध्ये पाणी साचण्याचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.
अलीकडेच, मुंबई महापालिकेच्या पर्जन्यजल विभागाने शुक्रवारी निविदा मागवल्या आहेत. कंत्राट पद्धतीने दोन वर्षांसाठी पंपासाठीच्या निविदा मागवण्यात आलेल्या आहेत. दरम्यान, पर्जन्यजल वाहिन्यांची कामे मुंबईमध्ये सर्वच ठिकाणी सुरू असूनही पंपाचा आकडा वाढताच आहे. पर्जन्यजल विभागाने महापालिकेच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये किती पाणी उपसण्याच्या पंपाची गरज आहे, याचा आकडा मागितला आहे. त्याप्रमाणे महानगर पालिकेच्या वेगवेगळ्या विभागांना ते संच पुरवले जाणार आहेत. गेल्या वर्षी महापालिकेकडे एकूण 422 पंप होते, पण आता यावर्षी हाच आकडा 547 पर्यंत गेलेला आहे. गरजेप्रमाणे पंपांचा बदल केला जात आहे.
advertisement
पर्जन्य जलवाहिन्या विभागातील अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2026 या वर्षासाठी 547 पंपाची मागणी करण्यात आलेली आहे. ज्या ठिकाणी पंपाची गरज नाही, त्या ठिकाणी ती ठेवली जाणार नाही. बीएमसीने जाहीर केलेल्या निविदांमध्ये पाणी उपसा पंपाच्या दोन वर्षांचा अंदाजित खर्च 142 कोटींपर्यंतचा आहे. 547 पाणी उपसा पंप विभागाप्रमाणे लावले जाणार आहेत. शहरी भागामध्ये 146 पंप, पश्चिम उपनगरामध्ये 223 पंप तर पूर्व उपनगरामध्ये 178 पंप लावावे लागणार असल्याची माहिती पर्जन्य जलवाहिन्या विभागातील अधिकार्‍यांनी दिली आहे. याशिवाय, सध्या मुंबईमध्ये नाले सफाईचे काम सुद्धा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. पावसाळ्याच्या आधी सर्व नाल्यांची सफाई करण्याचे बीएमसीने उद्दिष्ट ठेवले आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News: पावसाळ्याआधी मुंबई ॲक्शन मोडवर, पाणी उपसा पंपाचा आकडा वाढला
Next Article
जगातील सर्वात आनंदी देश फिनलंड, सर्वात दुःखी कोण? भारताचा आनंद नेमका कुठे अडकला? या वर्षी पाकिस्तानच्या मागे
जगातील सर्वात आनंदी देश फिनलंड, सर्वात दुःखी कोण? भारताचा आनंद नेमका कुठे अडकला?
  • आर्थिक संकटात असलेला पाकिस्तान भारतापेक्षा जास्त आनंदी?

  • 'वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट' वाचून चक्रावून जाल

  • सर्वात आनंदी देश फिनलंड, तर सर्वात दुःखी अफगाणिस्तान

View All
advertisement