advertisement

लालपरी आता धूर सोडणार नाही! एसटी महामंडळाचा मोठा निर्णय, 14 हजार बसेस...

Last Updated:

ST Bus: इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणाऱ्या नागरिकांना सरकारकडून विशेष कर सवलती आणि टोल माफी देण्यात येणार आहे.

ST Bus: लालपरी आता धूर सोडणार नाही! एसटी महामंडळाचा मोठा निर्णय, 14 हजार बसेस...
ST Bus: लालपरी आता धूर सोडणार नाही! एसटी महामंडळाचा मोठा निर्णय, 14 हजार बसेस...
मुंबई : सध्याच्या काळात वाढते प्रदुषण आणि इंधनाच्या दरांतील अस्थिरता यामुळे पर्यावरणपुरक इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढत आहे. त्यातच सरकारकडून देखील अशा वाहनांना सवलतीच्या योजना जाहीर करण्यात येत आहेत. आता लालपरी देखील धूर सोडणं बंद करणार आहे. येत्या 2035 पर्यंत एसटी महामंडळाच्या ताफ्यातील 14 हजार बसेस पूर्णपणे इलेक्ट्रिक करण्यात येतील, अशी घोषणाच परिवहन मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली.
मंत्री प्रताप सरनाईक यांनी नियम 293 अंतर्गत मांडलेल्या प्रस्तावावर विधानसभेत उत्तर दिले. यावेळी वाढते प्रदूषण आणि इंधन दरांतील अस्थिरता पाहता, ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी असणार्या एसटीला हरित ऊर्जेची जोड देण्याची गरज व्यक्त केली. या निर्णयामुळे पर्यावरणाचे रक्षण होणार आहे. तसेच इंधन आणि देखभाल खर्चात देखील मोठी घट होईल आणि एसटीची स्थिती सुधारेल, असे सरनाईक म्हणाले.
advertisement
दरम्यान, इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणाऱ्या नागरिकांना सरकारकडून विशेष कर सवलती आणि टोल माफी देण्यात येणार आहे. राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर दर 25 किलोमीटर अंतरावर चार्जिंग स्टेशन्स उभारली जातील आणि ही चार्जिंग स्टेशन्स सौर ऊर्जेवर चालवण्याला प्राधान्य दिले जाईल, असेही सरनाईक यांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
लालपरी आता धूर सोडणार नाही! एसटी महामंडळाचा मोठा निर्णय, 14 हजार बसेस...
Next Article
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; फक्त जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
  • राजस्थान रॉयल्सची 15,300 कोटींना विक्री

  • मालकाच्या खिशात 3,000 कोटी कमी का?

  • BCCIला किती मिळाले? चक्रावून टाकणारे गणित

View All
advertisement