फक्त 7 दिवसांची मुदत, माफी मागा किंवा... तिसरा पर्याय नाही; आयोगाचा राहुल गांधींना अल्टिमेटम
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Election Commission Vs Rahul Gandhi: मतांच्या चोरीच्या आरोपांवरून केंद्रीय निवडणूक आयोगाने आज तातडीची पत्रकार परिषद घेतली आणि राहुल गांधींना थेट इशारा दिला. सात दिवसांत शपथपत्र द्या किंवा देशाची माफी मागा, असा कडक इशारा मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिला.
नवी दिल्ली: मतांच्या चोरीवरून झालेल्या आरोपानंतर आज रविवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने तातडीने पत्रकार परिषद घेऊन याबाबतच्या सर्व टीकांवर उत्तर दिले. पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राहुल गांधी यांच्या 'संविधानाची शपथ' या युक्तिवादाला प्रत्युत्तर दिले. त्यांनी सांगितले की, ज्या मतदारसंघात तक्रार केली जात आहे, त्या मतदारसंघातील मतदार नसलेल्या व्यक्तीला 'साक्षीदार' म्हणून शपथ घेणे बंधनकारक आहे.
राहुल गांधींना सात दिवसांची मुदत
निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना एकतर सात दिवसांच्या आत शपथपत्र सादर करण्यास सांगितले आहे किंवा त्यांच्या आरोपांबद्दल देशाची माफी मागण्यास सांगितले आहे.
आरोपांना दिलेले उत्तर
दिल्लीतील पत्रकार परिषदेत न्यूज 18 इंडियाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की- जर तुम्ही त्या मतदारसंघाचे मतदार नसाल, तर कायद्यानुसार तुमच्याकडे फक्त एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे 'द रजिस्ट्रेशन ऑफ इलेक्टर्स रूल्स'च्या नियम क्रमांक 20, उपकलम (3), उपकलम (बी) नुसार तुम्ही साक्षीदार म्हणून तुमची तक्रार दाखल करू शकता. यासाठी तुम्हाला निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यासमोर शपथ घ्यावी लागेल आणि ती शपथ ज्या व्यक्तीविरोधात तुम्ही तक्रार केली आहे, तिच्या समोर घेतली जाईल.
advertisement
मुख्य निवडणूक आयुक्तांनी राहुल गांधींना त्यांच्या आरोपांसाठी एकतर शपथपत्र सादर करण्यास किंवा देशाची माफी मागण्यास सांगितले. ते म्हणाले, शपथपत्र द्या किंवा देशाची माफी मागा. तिसरा कोणताही पर्याय नाही. जर सात दिवसांत शपथपत्र दिले नाही, तर याचा अर्थ सर्व आरोप निराधार आहेत.
#WATCH | दिल्ली: चुनाव आयोग को लेकर राहुल गांधी के आरोपों पर मुख्य चुनाव आयुक्त ज्ञानेश कुमार ने कहा, "...या तो हलफनामा देना होगा या देश से माफ़ी मांगनी होगी। कोई तीसरा विकल्प नहीं है। अगर 7 दिनों के अंदर हलफनामा नहीं मिलता है तो इसका मतलब है कि ये सभी आरोप बेबुनियाद हैं..." pic.twitter.com/zoI1DUlpKs
— ANI_HindiNews (@AHindinews) August 17, 2025
advertisement
राहुल गांधींचे आयोगावरील आरोप
काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी आपल्या 'मतांची चोरी'च्या दाव्यांना पाठिंबा देण्यासाठी शपथपत्र मागितल्याबद्दल निवडणूक आयोगावर टीका केली होती. राहुल गांधी म्हणाले होते, निवडणूक आयोग मला शपथपत्र आणि शपथ घेऊन माहिती देण्यास सांगत आहे. मी संसदेत संविधानाची शपथ घेतली आहे.
त्यांनी असा आरोप केला होता की निवडणूक आयोगाने भाजपसोबत संगनमत करून लोकांकडून लोकसभा निवडणुका "चोरल्या".
advertisement
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजनला सुरुवात केल्यानंतर राजकारण तापले आहे. विरोधकांनी असा आरोप केला होता की, निवडणूक आयोग भाजपच्या फायद्यासाठी लोकांची नावे मतदार यादीतून वगळत आहे.
निवडणूक आयोगाच्या आजच्या पत्रकार परिषदेवर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते पवन खेरा यांनी आरोप केला की, मुख्य निवडणूक आयुक्त भाजपच्या एजंटप्रमाणे काम करत आहेत.
advertisement
आयोगावर ताजे आरोप
आज सकाळी राहुल गांधी यांनी बिहारमध्ये मतदार यादीतील नावे जोडणे आणि वगळणे (SIR) द्वारे विधानसभा निवडणुकांमध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला.
सासराम येथे आपल्या 1,300 किमीच्या 'मतदाता अधिकार यात्रे'च्या शुभारंभप्रसंगी ते म्हणाले, संपूर्ण देशात विधानसभा आणि लोकसभा निवडणुका चोरल्या जात आहेत आणि त्यांचा शेवटचा कट म्हणजे बिहारमधील निवडणुका चोरण्यासाठी SIR द्वारे मतदार जोडणे आणि वगळणे.
advertisement
आम्ही त्यांना बिहारमधील निवडणुका चोरी करू देणार नाही. बिहारचे लोक त्यांना निवडणुका चोरी करू देणार नाहीत. गरिबांकडे फक्त मताची ताकद आहे आणि ते त्यांना निवडणुका चोरू देणार नाहीत, असेही ते म्हणाले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 17, 2025 5:05 PM IST
मराठी बातम्या/देश/
फक्त 7 दिवसांची मुदत, माफी मागा किंवा... तिसरा पर्याय नाही; आयोगाचा राहुल गांधींना अल्टिमेटम


