कश्मीरमध्ये अलर्ट! ISI, ISPR कडून युद्धाचा प्लॅन; भारताविरोधात उभारले Wilayat Kashmirचे नवे डेथ सेल

Last Updated:

Jammu and Kashmir: पाकिस्तानने पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरमध्ये अशांतता पसरवण्याचा कट रचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ISI-ISPRने बंद पडलेला ‘विलायत कश्मीर’ ऑपरेशन पुन्हा सक्रिय केल्यामुळे भारतीय सुरक्षा यंत्रणा पूर्ण अलर्टवर आहेत.

News18
News18
नवी दिल्ली / श्रीनगर: पाकिस्तानच्या भारताविरोधातील कुरापती कारवाया अजून सुरूच आहेत. सीमेपलिकडून पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरमध्ये अशांतता पसरवण्याचा आणि दहशतवादी कारवायांना खतपाणी घालण्याचा मोठा कट रचला जात असल्याची माहिती समोर आली आहे. गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, पाकिस्तानची लष्करी माध्यम शाखा आयएसपीआर (ISPR) ने आपली दहशतवादी रणनीती पूर्णपणे बदलली आहे.
advertisement
पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय (ISI) आणि आयएसपीआर यांनी मिळून अनेक वर्षांपासून बंद असलेला ‘विलायत कश्मीर’ (Wilayat Kashmir) हा ऑपरेशन पुन्हा सक्रिय केला आहे. यामागचा उद्देश भारतात घुसखोरी वाढवणे आणि हल्ले तीव्र करणे हा आहे.
टीटीपीचं नाव, पण सूत्रं आयएसआयकडेच
advertisement
सूत्रांच्या माहितीनुसार पाकिस्तान आता जगाच्या नजरेत धूळफेक करण्यासाठी नवी खेळी करत आहे. या संपूर्ण कटात सार्वजनिकपणे तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) या संघटनेचं नाव वापरलं जात आहे. मात्र प्रत्यक्षात या कारवायांची सूत्रं आयएसआयच्या जुन्या विश्वासू नेटवर्ककडेच आहेत.
advertisement
अहवालांनुसार आयएसपीआरने तांत्रिक पातळीवर टीटीपीच्या काही गटांमध्ये घुसखोरी केली असून, या गटांचा वापर भारताविरोधात करण्याची तयारी सुरू आहे.
advertisement
या नव्या दहशतवादी कटासाठी पाकिस्तानने थेटशॅडो गव्हर्नरनेमले आहेत. या नियुक्त्या काश्मीर आणि गिलगित-बाल्टिस्तान भागासाठी करण्यात आल्या आहेत.
डॉ. अहमद कश्मीरी: यालाविलायत कश्मीर’चा शॅडो गव्हर्नर बनवण्यात आलं आहे. काश्मीर खोऱ्यात पुन्हा दहशतवादी नेटवर्क उभारण्याची जबाबदारी याच्याकडे आहे.
advertisement
मौलाना अब्दुल हमीद: याला गिलगित-बाल्टिस्तानमधीलडायमरउपविभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.
मौलवी हबीब-उर-रहमान: यालादारेलउपविभागाचा शॅडो गव्हर्नर नेमण्यात आलं आहे.
advertisement
गिलगित-बाल्टिस्तानमध्ये नवी दहशतवादी युनिट
फक्त काश्मीरपुरते मर्यादितराहता, पाकिस्तानने पीओकेलगतच्या भागांमध्येही आपली पकड मजबूत करण्यासाठीविलायत गिलगित-बाल्टिस्ताननावाची नवी दहशतवादी युनिट स्थापन केली आहे. हे युनिट दारेल आणि डायमर या दोन भागांत विभागले आहे.
या दुर्गम भागांमधून दहशतवाद्यांची भरती करणे आणि भारतात घुसखोरी सुलभ करणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.
भारतीय सुरक्षा यंत्रणा अलर्टवर
या गुप्तचर माहितीनंतर भारतीय सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाल्या आहेत. सीमारेषेवर नजर वाढवण्यात आली असून, हालचालींवर कडक लक्ष ठेवलं जात आहे. सुरक्षा यंत्रणांचं मत आहे की पाकिस्तान टीटीपीचं नाव पुढे करून स्वतःची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करत आहे. मात्रविलायत कश्मीरपुन्हा सुरू करणं हे थेट भारताच्या सुरक्षेला आव्हान देणारे पाऊल आहे.
या संपूर्ण दहशतवादी नेटवर्कला उद्ध्वस्त करण्यासाठी भारतीय लष्कर आणि गुप्तचर यंत्रणा सध्या ठोस रणनीती आखत असल्याची माहिती आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
कश्मीरमध्ये अलर्ट! ISI, ISPR कडून युद्धाचा प्लॅन; भारताविरोधात उभारले Wilayat Kashmirचे नवे डेथ सेल
Next Article
advertisement
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच, सुधारणा म्हणजे लोकांचे ओझे कमी करणे : पंतप्रधान मोदी
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच : पंतप्रधान मोदी
  • पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकार सामान्य नागरिकांचे जीवन सोपे करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

  • कर कायदे, श्रम संहिता, जीएसटी सुधारणा आणि उद्योगांसाठी नियम सुलभ करून प्रक्रिया सुलभ झाली.

  • मध्यमवर्गीयांना कर सवलत, एमएसएमईना कर्ज व सवलती, ग्रामीण रोजगारात टिकाऊ मालमत्ता निर्माण होत आहे.

View All
advertisement