नो मोर बॉस! भारताने अमेरिकेला धडा शिकवायचे ठरवले, मोदी-राजनाथनंतर आता गडकरींची एन्ट्री, दिला Loud And Clear मेसेज

Last Updated:

Tariff War: भारत सरकारचे तीन मोठे चेहरे पंतप्रधान मोदी, राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी यांनी अमेरिकेच्या टॅरिफ आणि दबाव धोरणाला थेट आव्हान देत आहेत. भारताचा संदेश स्पष्ट आहे की दादागिरी मान्य नाही, जे होईल ते समानतेवरच होईल.

News18
News18
नवी दिल्ली: डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर एकामागून एक टॅरिफ लावून कदाचित असा विचार केला असेल की भारत काही दिवसांतच त्यांच्या अटी मान्य करेल. तसेच भारत रशियाकडून तेल घेणे बंद करेल आणि अमेरिकेसोबत हवा तसा व्यापार करार करण्यास भाग पडेल. पण भारताकडून असे उत्तर आले आहे की ट्रम्प यांच्याकडे संताप व्यक्त करण्याशिवाय काहीही उरले नाही. आता तर भारत सरकार उघडपणे त्यांच्या दादागिरीला आव्हान देत आहे.
आधी पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत कोणत्याही परिस्थितीत आपल्या शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड करणार नाही. नंतर राजनाथ सिंह म्हणाले, काही लोक स्वतःला बॉस समजतात. आणि आता केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनीही म्हटले की, आर्थिकदृष्ट्या संपन्न देश दादागिरी करतात. राजधानी दिल्लीतील 3 महत्त्वाच्या नेत्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे भारताचा ट्रम्प विरोधात काही वेगळाच डाव सुरू असल्याचे दिसून येत आहे.
advertisement
प्रत्येक किंमत चुकवण्यासाठी तयार- PM मोदी
आमच्यासाठी आमच्या शेतकऱ्यांचे हित हेच प्राधान्य आहे. भारत आपल्या शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमार बांधवांच्या हिताशी कधीही तडजोड करणार नाही. याची किती मोठी किंमत मोजावी लागेल याची मला जाणीव आहे, पण मी त्यासाठी तयार आहे.
नरेंद्र मोदी, पंतप्रधान
काही लोक स्वतःला बॉस समजतात
काही लोक स्वतःला जगाचे बॉस समजतात… त्यांना भारताचा विकास आवडत नाहीये. अनेकजण प्रयत्न करत आहेत की भारतात बनलेल्या, भारतीयांच्या हाताने तयार झालेल्या वस्तू त्या देशात बनलेल्या वस्तूंहून अधिक महाग व्हाव्यात, जेणेकरून जेव्हा वस्तू महाग होतील तेव्हा जग त्या विकत घेणार नाही. पण मी पूर्ण आत्मविश्वासाने सांगतो की आता जगातील कोणतीही ताकद भारताला जगातील एक मोठी शक्ती बनण्यापासून रोखू शकत नाही.- राजनाथ सिंह, संरक्षण मंत्री
advertisement
श्रीमंत देश दादागिरी करतात
आज जे दादागिरी करतात ते यामुळे करतात कारण ते आर्थिकदृष्ट्या संपन्न आहेत, कारण त्यांच्याकडे तंत्रज्ञान आहे. जर आपल्याकडे त्यांच्यापेक्षा चांगले तंत्रज्ञान आणि संसाधने आली तर आपल्याला दादागिरी करायची नाही. आपली संस्कृती 'विश्व कल्याणा'ची शिकवण देते. जर आपल्याला विश्वगुरू बनायचे असेल तर आपल्या वैज्ञानिकांनी आणि अभियंत्यांनी त्या दिशेने काम करायला हवे. मला वाटत नाही की आपल्याला कोणाकडे जाण्याची गरज पडेल.- नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री
advertisement
या भूमिकेचा अर्थ समजून घ्या
पंतप्रधान मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या तिघांचीही भाषा स्पष्ट होती की भारत आता मागे हटणार नाही. हा संदेश अनेक बाबतीत महत्त्वाचा आहे.
१. स्वावलंबन: भारताने हे स्पष्ट केले आहे की तो व्यापार युद्धातही आत्मनिर्भरता आणि देशांतर्गत उद्योगांच्या संरक्षणासाठी कठोर पाऊले उचलू शकतो.
advertisement
२. धोरणात्मक संघर्ष: ही केवळ आर्थिक लढाई नाही तर एक भू-राजकीय संघर्ष (geopolitical war) देखील आहे. भारत आपल्या अटींवर भागीदारी करू इच्छितो, कोणत्याही दबावाला बळी पडून नाही.
३. सरकारी धोरण: सरकारमधील तीन मोठ्या नेत्यांनी अशी एकसारखी आक्रमक भूमिका घेणे हे दर्शवते की हे केवळ वैयक्तिक विधान नाही, तर हे सरकारचे एक धोरण आहे.
advertisement
अमेरिका आणि ट्रम्प यांना स्पष्ट संदेश
अमेरिका आणि ट्रम्प यांच्यासाठी हा एक कडक संकेत आहे की भारतासोबतचे संबंध आता समानतेच्या आधारावरच पुढे जातील. याचा परिणाम केवळ द्विपक्षीय व्यापार चर्चांवरच नाही, तर जागतिक मंचांवर भारताची बोलणी करण्याची स्थिती देखील मजबूत होईल. हे स्पष्ट आहे की भारत आता केवळ बचावात्मक नाही, तर पलटवार करण्याची रणनीती अवलंबत आहे.
advertisement
व्यापार आणि मुत्सद्देगिरी तज्ञ डॉ. अरविंद मोहन यांच्या मते, भारताची ही भूमिका दर्शवते की आता आपण 'नियम स्वीकारणारे' (Rule Taker) नाही, तर 'नियम बनवणारे' (Rule Maker) बनू इच्छितो. अमेरिकेने हे समजून घ्यायला हवे की भागीदारी तेव्हाच टिकेल जेव्हा दोन्ही पक्ष समानतेने वागतील. हा केवळ आर्थिक संघर्ष नाही तर तो धोरणात्मक आत्मविश्वासाचे प्रदर्शन आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
नो मोर बॉस! भारताने अमेरिकेला धडा शिकवायचे ठरवले, मोदी-राजनाथनंतर आता गडकरींची एन्ट्री, दिला Loud And Clear मेसेज
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement