कर्नाटकात ‘हाय कमांड' वरून हाय ड्रामा; काँग्रेसमधील ‘अदृश्य शक्ती’ राज्यातील सत्ता घालवणार

Last Updated:

Karnataka CM News: काँग्रेसमधील नेतृत्वाच्या गोंधळावर भाष्य करताना भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी उपहासात्मक टिप्पणी करत काँग्रेस हाय कमांडची तुलना “भूत”शी केली. त्यांनी म्हटले की, ती नजरेस न पडणारी, ऐकू न येणारी पण नेहमी जाणवणारी सत्ता आहे.

News18
News18
नवी दिल्ली: जेव्हा काँग्रेस पक्षासमोर कोणतेही संकट येते, तेव्हा सहसा दोन प्रकारचे नेते टीव्ही कॅमेर्‍यांसमोर दिसून येतात. एक असे जे स्वतःच्या भावना स्पष्टपणे मांडतात आणि दुसरे असे जे पक्षाच्या अधिकृत भूमिकेवर ठाम राहतात आणि म्हणतात की “हाय कमांड” अंतिम निर्णय घेईल.
काँग्रेस नेत्यांनी निर्णय ‘हाय कमांड’कडे सोपवणे हे नवीन नाही. मात्र जेव्हा पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे देखील तेच करतात तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटते. खर्गे यांचे वक्तव्य भाजपच्या या आरोपाला बळकटी देते की सोनिया गांधी आणि त्यांची मुले – राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वढेरा – अजूनही पक्ष चालवतात.
कर्नाटकमध्ये नेतृत्व बदलाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर सोमवारी पत्रकारांनी खर्गे यांना या विषयावर स्पष्ट भूमिका मांडण्यास सांगितले. मात्र त्यांनी या अफवा फेटाळण्याऐवजी असे सांगितले की हा विषय पक्षाच्या हाय कमांडकडे आहे.
advertisement
या प्रतिक्रियेवर अनेकांनी प्रतिक्रिया दिली. भाजपचे बेंगळुरू दक्षिणमधील खासदार तेजस्वी सूर्या यांनी विचारले, “काँग्रेसमध्ये नक्की हाय कमांड कोण आहे?”
सूर्याने उपहासात्मकपणे म्हटले की काँग्रेस हाय कमांड म्हणजे “भूत”सारखी आहे – ती नजरेला दिसत नाही, ऐकू येत नाही, पण सतत जाणवते. ज्याला लोक हाय कमांड समजत होते – काँग्रेस अध्यक्ष – तो देखील तिचे नाव कुजबुजतो आणि म्हणतो की तोच ती नाही, असेही सूर्या म्हणाले.
advertisement
खरगे यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी म्हटले की काँग्रेस अध्यक्षाला पक्षात काही किंमत नाही आणि केवळ गांधी कुटुंबच सर्व निर्णय घेते.
काँग्रेस हाय कमांड म्हणजे काय?
काँग्रेस कार्यकारिणी समिती (CWC)- जी काँग्रेस हाय कमांड म्हणून ओळखली जाते. ही काँग्रेस पक्षाची सर्वोच्च कार्यकारी समिती आहे आणि सर्व निर्णयांवर अंतिम शिक्कामोर्तब हीच समिती करते. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी वढेरा, के.सी. वेणुगोपाल, जयराम रमेश, पी. चिदंबरम, सचिन पायलट, शशी थरूर आणि अन्य 28 नेते या समितीचे सदस्य आहेत.
advertisement
पंजाब-राजस्थान-मध्यप्रदेश गमावले, कर्नाटक हातातून जाणार
पंजाब: 2021 मध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवजोत सिंग सिद्धू यांच्या भांडणात हाय कमांड महिनों महिने मूकदर्शक राहिला. परिणाम असा झाला की पक्षाचे दिग्गज नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांना बाहेर जावे लागले. सिद्धू नाराज आहेत आणि पक्षाचा जनाधार ढासळला.
राजस्थान: असंच काहीसं राजस्थानमध्ये झालं. 2020 ते 2022 पर्यंत अशोक गेहलोत आणि सचिन पायलट गटांमध्ये ताणतणाव होता. हाय कमांड टाळत राहिला आणि मुद्दा प्रलंबित राहिला. कार्यकर्ते संभ्रमात राहिले, आणि परिणामी जनता दूर गेली. पक्ष सत्तेतून बाहेर गेला.
advertisement
मध्य प्रदेश: एमपीच्या कथेतही हाय कमांडचा पेच होता. 2020 मध्ये विजय मिळवल्यानंतर ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या बंडखोरीला हाय कमांडने हलकं घेतलं आणि काँग्रेस सरकार पडलं. भाजपने निवडणूक न जिंकता सत्ता मिळवली.
आता कर्नाटक: आता कर्नाटकमध्येही काँग्रेसच्या आत नाराजीच्या बातम्या आहेत. पण मल्लिकार्जुन खर्गे यांच्या वक्तव्याने आगीत तेल ओतले आहे. कारण ते स्वतः कर्नाटकचे आहेत आणि तरीही निर्णय 'दिल्ली'वर सोपवत आहेत.
advertisement
भाजपचा अचूक वार 
भाजप काँग्रेसवर थेट हल्ला करत आहे. भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी लिहिले की- काँग्रेस अध्यक्षाला काहीच किंमत नाही. फक्त गांधी कुटुंबच निर्णय घेतं. हाच तो जुना आरोप आहे, जो राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर पक्षाच्या वारंवार होणाऱ्या पराभवात दिसून आला आहे. मोठा प्रश्न आहे की काँग्रेस 'हाय कमांड'च्या पलीकडे जाईल का किंवा कर्नाटकही हातातून जाईल? काँग्रेसला जवळून ओळखणारे मानतात की- जोपर्यंत निर्णयाची चावी काही चेहऱ्यांकडे राहील, काँग्रेस राज्यात सत्ता मिळवेल पण ती टिकवू शकणार नाही.
view comments
मराठी बातम्या/देश/
कर्नाटकात ‘हाय कमांड' वरून हाय ड्रामा; काँग्रेसमधील ‘अदृश्य शक्ती’ राज्यातील सत्ता घालवणार
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement